no helmet no petrol esakal
देश

देशातील ९५ टक्के लोकांना पेट्रोलची गरजच नाही - भाजप मंत्री

इंधनाच्या दरवाढीवरुन उत्तर प्रदेशातील मंत्र्याचं अजब विधान

Amit Ujagare (अमित उजागरे)

लखनऊ : "देशातील ९५ टक्के लोकांना पेट्रोलची गरजच नाही," असं अजब विधान उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री उपेंद्र तिवारी यांनी केलं आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरुन मोदी सरकारला सध्या लोकांचा रोष सहन करावा लागत आहे. यापार्श्वभूमीवर सरकारच्या समर्थनार्थ तिवारी यांनी हे विधान केलं आहे.

तिवारी म्हणाले, जर दरडोई उत्पन्नाची देशातील इंधनाच्या किंमतीशी तुलना केली तर इंधनाचे दर खूप कमी आहेत. "मोजकेच लोक चारचाकी वापरतात आणि त्यांना पेट्रोलची गरज असते. 95 टक्के लोकांना पेट्रोलची गरज नसते. दरम्यान, 100 कोटीपेक्षा जास्त लसीचे डोस लोकांना मोफत दिले गेले"

देशात आज (गुरुवारी) कोरोना लसीकरणाचा १०० कोटी डोसचा टप्पा पूर्ण झाला. यानिमित्त केंद्र सरकारचे विविध मंत्र्यांकडून आणि राजकीय व्यक्तींकडून अभिनंदन करण्यात आले. यानिमित्त केंद्रानं गायक कैलाश खेर यांच्या आवाजातील एका थीम सॉंगचं प्रकाशन केलं. दरम्यान, जागतीक आरोग्य संघटनेनंही या विशेष कामगिरीबद्दल भारतीयांचं अभिनंदन केलं आहे.

देशात जानेवारी २०२१ मध्ये सार्वत्रिक लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. त्यानंतर आज १०० कोटी डोस पूर्ण झाल्यानंतर या मोहिमेतील मोठा मैलाचा टप्पाचा पार पडला. यामध्ये पहिला डोस आणि दोन्ही डोस यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

FDA Crime : पुण्यातील बर्गर किंगवर एफडीएची कारवाई; अकरा हॉटेलचे परवाने निलंबित

''भारत शांततेवर विश्वास ठेवतो, पण...''; स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती मुर्मूंचं देशवासीयांना संबोधन

Marathi News Live Updates : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी घोषणा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू स्थापन करणार नवा राजकीय पक्ष

Manchar News : ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा! मंचरला ‘टॉपकॉन ट्रायटन’ मशीनद्वारे रेटिना व सूक्ष्म रक्तवाहिन्यांचे अचूक पद्धतीने होणार परीक्षण

SCROLL FOR NEXT