asaduddin owais Sakal
देश

Video : महागाईला मोदी नव्हे, तर मुघल जबाबदार; ओवैसी

देशात ताजमहाल बांधला नसता तर, आज पेट्रोल 40 रुपयांना उपलब्ध झाले असते.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशातील वाढत्या महागाई (Inflation) आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून AIMIM चे प्रममुख असदुद्दीन ओवैसींनी (Asaduddin Owais) पुन्हा एकदा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. देशातील वाढती महागाई आणि बेरोजगारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) नव्हे, तर मुघल जबाबदार असल्याचे म्हणत त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. एवढेच नव्हे तर, देशात ताजमहाल (Tajmahal) बांधला नसता तर, आज पेट्रोल (Petrol) 40 रुपयांना उपलब्ध झाले असते असे म्हणत त्यांनी पेट्रोलच्या वाढत्या दरावरून मोदींना घेरले आहे. ताजमहाल आणि लाल किल्ला बांधून मुघलांनी चूक केली असे म्हणते हा पैसा वाचवला गेला पाहिजे होता म्हणजे 2014 मध्ये मोदीजी आल्यानंतर त्यांना हे पैसे दिले गेले असते. एआयएमआयएमच्या ट्विटर हँडलवरून ओवैसींचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. (Asaduddin Owais News In Marathi )

भारतातील तरुण बेरोजगार (Unemployment) आहेत, महागाई गगनाला भिडली आहे, डिझेल 100 रुपयांच्या पुढे गेले असून, याला पीएम मोदी नाही तर,मुघल सम्राट औरंगजेब जबाबदार असल्याचा टोमणा ओवैसी केंद्राला लगावताना दिसत आहे. पेट्रोल 115 रुपये लिटर झाले आहे, यासाठी ताजमहालचा बिल्डर जबाबदार आहे. ताजमहाल बांधला नसता तर, आज पेट्रोल 40 रुपयांना उपलब्ध झाले असते. ताजमहाल आणि लाल किल्ला बांधून त्यांनी चूक केली. त्याऐवजी ते पैसे वाचवून 2014 मोदी आल्यानंतर त्यांना हे पैसे दिले गेले असते.

'सर्व गोष्टींना मुस्लिम आणि मुघल जबाबदार आहेत. भारताच्या इतिहासात मुघल राजवट होती का? त्यापूर्वी सरकार नव्हते. सम्राट अशोक हे चंद्रगुप्त मौर्याचे सरकार नव्हते का? अनेक सरकारे होती. मात्र भाजपच्या नजरेत फक्त मुघल दिसत आहे. एका डोळ्यात मुघल आणि दुसऱ्या डोळ्यात पाकिस्तान. 'आम्हाला मुघलांकडून काही घ्यायचे नाही आणि पाकिस्तानशी आमचा काही संबंध नाही.

15 ऑगस्ट रोजी आपण स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करणार आहोत. भारतात जेवढे मुस्लिम आहेत ते सर्व याच गोष्टीची साक्ष देतात की, त्यांच्या आजोबा आणि पणजोबांनी पाकिस्तानचा संदेश नाकारला होता. तसेच भारताला ते आपली मातृभूमी मानत होते. भारत ही आपली मातृभूमी आहे ती आम्ही कधीही सोडणार नाही. प्रत्येकवेळी तुम्ही सोडून जा सोडून जा अशा घोषणा देत असता मात्र, आम्ही देश सोडणे तर दूरच असे म्हणत आम्ही जिवंत या भारताच्या धरतीवर राहू आणि मेलो तरी याच धरतीवर जाऊ असे ओवैसींनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT