ICMR
ICMR 
देश

सकस आहाराची मात्राच प्रभावी

वृत्तसंस्था

कोरोना संदर्भात ‘आयसीएमआर’कडून शिफारशी, उष्मांक गरजेचा 
नवी दिल्ली - कोरोनाकाळात सुदृढ राहणे आवश्‍यक असल्याने पोषक आहार घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. मात्र नेमका कसा आहार घ्यावा, हे अनेकांना समजत नाही. यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) हैदराबाद येथील राष्ट्रीय पोषण संस्थेने (एनआयआय) एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यानुसार आपल्या रोजच्या आहारात दोन हजार उष्मांक असायला हवेत. एवढे उष्मांक एकाच खाद्यातून नाही तर वेगवेगळ्या पदार्थ्यांमधून मिळायला हवेत. ‘आयसीएमआर’च्या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार आपल्या आहारात ऊर्जेचे एक नव्हे तर अनेक स्रोत असायला हवेत. एकाच अन्नपदार्थावर अवलंबून राहिले तर आपल्याला ऊर्जा तर मिळेल पण शरीरातील जीवनसत्त्व, प्रथिने आणि कॅल्शियम यांचे संतुलन बिघडू शकते.

आहारतज्ज्ञांचे मत
‘सूर्यप्रकाश, दही, गूळ आणि हरभऱ्यामधूनही मोठ्या प्रमाणावर उष्मांक मिळू शकतात. आपल्याकडे अनेक प्रकारचे पर्याय आहेत. फक्त आपला भर ताजे व सकस अन्न खाण्यावर हवा,’’ असे रायपूरमधील आहारतज्ज्ञ डॉ. निधी पांडेय यांनी सांगितले. ऑफिसमध्ये काम करणारा नोकरदार वर्ग खूप व्यस्त असतो. ते ‘आयसीएमआर’च्या आहार सूचनांचे पूर्ण पालन करू शकत नाहीत. यासाठी त्यांनी सुकामेवा आहारात ठेवावा. ऊर्जेचा हा खूप मोठा स्रोत आहे. याच्या वापरातून जीवनसत्त्वाचे संतुलनही योग्य राहते, असे त्या म्हणाल्या.

शहरात व गावांमधील लोकांचा सध्याचा आहार

  • 'आयसीएमआर’च्या अहवालानुसार ऊर्जास्त्रोत म्हणून धान्यावर ४५ टक्के अवलंबून राहणे योग्य ठरते. पण शहरांत आणि गावांमध्ये हे प्रमाण पाळले जात नाही शहरात ५१ टक्के तर ग्रामीण भागात ६५.२ टक्के अवलंबित्व धान्यावर असते.
  • ऊर्जेसाठी डाळी, फळे, मांस, अंडी, मासे यांचा आहारात समावेश करायला हवा. हे प्रमाण १७ टक्के हवे, पण ते सध्या ११ टक्केच आहे. लोकांच्या आहारात या गोष्टी पुरेशा प्रमाणात नसतात.
  • उष्मांकासाठी ५ टक्के भाज्या खाणे आवश्‍यक. मात्र गावात ८.८ टक्के व शहरात १७ टक्के नागरिक याचे पालन करतात.
  • सुकामेवा आणि तेलबियांचा गावात २२ टक्के वापर होतो तर शहरात २७ टक्के. हे प्रमाण कमी असावे, असा सल्ला ‘आयसीएमआर’ने दिला आहे.
  • ऊर्जा मिळण्यासाठी शहरांमध्ये चटपटीत पदार्थ आणि मिठाईचा वापर. याचा ११ टक्के वापर होतो, जो कमी व्हायला हवा. उत्कृष्ट प्रतीच्या प्रथिनांचा वापर गावांत ५ टक्के  व शहरात १८ टक्के लोक करतात. हे प्रमाण वाढणे आवश्‍यक आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamini Jadhav: यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून दक्षिण मुंबईमधून उमेदवारी

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT