Rajnath Singh
Rajnath Singh 
देश

जवानांना दुःखावणाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे- राजनाथसिंह

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जवानांच्या अस्मितेला ठेच पोचवणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवला पाहिजे, असे परखड मत गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज व्यक्त केले. दिल्ली- देहरादून महामार्गावरील सुभारती विद्यापीठात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

जगभरातील 20 राष्ट्रांच्या "बी-20' गटाच्या बैठकीत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले की, "भारत भ्रष्टाचार व दहशतवाद यांच्याविरुद्ध लढा देत आहे. अशा परिस्थितीत जर विदेशी बॅंकांनी भारतीय नागरिकांच्या परदेशात असलेल्या बॅंक खात्यांची माहिती पुरवली नाही तर भ्रष्टाचाराला रोख लावणे अवघड होईल, असेही राजनाथसिंह यांनी नमूद केले. 

तसेच भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबना करून त्याचे व्हिडिओ करण्याच्या पाकिस्तानच्या अमानूष कृत्यांबाबत ते म्हणाले, "अशा प्रक्षोभक कृत्यांना भारतीय लष्कराने अनेकवेळा उत्कृष्टरीत्या प्रत्त्युतर दिले आहे. सर्जिकल स्ट्रईक हे त्याचेच एक उदाहरण आहे.'' 
दरम्यान, लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी नागरिकांच्या प्रश्‍नांसाठी 24 तास उपलब्ध राहावे, असे आवाहन राजनाथसिंह यांनी केले. यावेळी जनतेशी संवाद साधताना त्यांनी नोटाबंदी, शेतकऱ्यांचे प्रश्‍न, भ्रष्टाचार, अर्थव्यवस्था व आंतरराष्ट्रीय कारभार या विषयांवर देखील चर्चा केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

Poha Idali: सकाळच्या नाश्त्यात बनवा चवदार पोहा इडली, जाणून घ्या रेसिपी

Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 मे 2024

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT