मुंबई : राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी साखर उद्योगांसाठी पाऊल उचलले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे त्यांनी काही शिफारशी आणि मागण्या केल्या आहेत. याबाबत त्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहलेल्या पत्रातील काही तपशीलवार मुद्दे शरद पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून शेअर केले आहेत.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
मोदींना लिहलेल्या पत्रात पवार म्हणतात, कोरोनासारख्या महामारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतात जाहीर करण्यात आलेल्या अभूतपूर्व लॉकडाऊनमुळे राज्यातील अनेक उद्योगांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. साखर उद्योगाचाही यात समावेश आहे. साखर उद्योगाला यातून बाहेर काढण्यासाठी आपण त्वरित हस्तक्षेप करून विविध उपाययोजना जाहीर कराव्यात अशी विनंती साखर कारखाने महामंडळ लिमीटेडच्या वतीनं करण्यात आली आहे.
पुणेकर खवय्यांसाठी महत्वाची बातमी; आधी वाचा मग ऑर्डर करा
लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वीपासूनच साखर उद्योग संकटात होता. त्यावेळी आपण इथेनॉलच्या उत्पादनासाठी किमान हमीभाव, साखरेची निर्यात, राखीव साठा, भांडवली खर्चावरील व्याजापोटी दिले जाणारे अनुदान इत्यादी आर्थिक उपाययोजना करण्यावर भऱ दिला. आता कोविड-१९ चे संकट दिवेंदिवस गडद होत चालले असतानाही आपण काही धोरणात्मक निर्णय घ्याल अशी अपेक्षा आहे. यासंदर्भात साखर कारखाने महामंडळ लिमीटेडने काही उपाययोजना पवार यांनी सुचवल्या आहेत.
म्हणून बिल गेट्स यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार
२०१८-१९ आणि २०१९-२० या वर्षांपासून प्रलंबित असलेल्या निर्यात प्रोत्साहन भत्त्यापोटी आणि राखीव साठ्याच्या खर्चापोटी निधीची तरतूद करण्याची मागणी शरद पवार यांनी केली आहे.
शरद पवार यांनी केलेल्या अन्य काही मागण्या
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.