Raksha bandhan sakal
देश

Raksha Bandhan 2023: स्वातंत्र्यलढ्यात राखी बनली होती प्रमुख हत्यार, गुरुदेव टागोरांचे आहे मोठे योगदान

रक्षाबंधनाचे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतही खुप मोठे योगदान आहे.

सकाळ डिजिटल टीम

Raksha Bandhan Festival : रक्षाबंधन हा ब भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे.पण रक्षाबंधनाचे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतही खुप मोठे योगदान आहे. कारण रक्षाबंधनने भारताची एकात्मता टिकवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

ही घटना आहे १६ ऑक्टोबर १९९५ ची. रक्षाबंधन होऊन एक महिना अधिक झाला होता. रविंद्रनाथ टागोर यांनी पहाटे गंगेत स्नान करून आपल्या दिवसाची सुरुवात केली होती आणि लोकांना मिरवणुकीसाठी बोलावले होते. वाटेत सापडलेल्यांना राखी बांधणे हा मिरवणुकीचा उद्देश होता. त्याच्यासोबत राख्यांचे बंडल होते. परंतू या मिरवणूकीचा भाऊ बहिणीशी काही एक संबंध नव्हता. हे रवींद्रनाथ टागौर यांनी हिन्दू-मुस्लिम एकता म्हणून आवाहन करत होते. त्यांनी हिंदू मुस्लिम लोकांना आवाहन केले होते की इंग्रजांच्या बोलण्यात येऊ नका. एकमेकांना राखी बांधा आणि शपथ घ्या की तुम्ही कधीही वेगळे होणार नाही आणि एकमेकांसाठी समोर येणार.

सणांचे महत्त्व तारखेनुसार नसते त्यासाठी भावना महत्त्वाच्या असतात. त्यामुळेच 16 अक्टूबर 1905 ला टागोर यांनी रक्षाबंधन साजरी केली.

भारताच्या ईशान्येकडील भागात सध्याचे आसाम, ओडिशा, बांगलादेश आणि बिहार यांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे त्यांचे व्यवस्थापण करणे इंग्रजांना कठीण वाटत होते. त्यामुळे या भागांची दोन स्वतंत्र राज्यांमध्ये विभागणी करावी, असा त्यांचा विचार होता. ब्रिटीश हिंदू मुस्लिम नुसार विभागणी करत होते कारण बंगालचा पूर्व भाग मुस्लिम बहुसंख्य होता आणि पश्चिम भागात हिंदू समाजाचे वर्चस्व होते.

या फाळणीच्या विरोधात देशभरात आंदोलने झाली. पण ती फाळणी थांबवण्यासाठी टागोरांनी रक्षाबंधनला नवे महत्त्व दिले.रक्षाबंधन हा बहिण भावाचा फक्त सण नाही तर प्रत्येक नागरिकांचा एकमेकांप्रती रक्षा करण्याचा सण आहे.या दिवशी तुम्ही एकमेकांची रक्षा करण्याची शपथ घेऊ शकता, मग ती रक्षा हिंदू मुस्लिम धर्माच्या एकतेची रक्षा का नसो, अशा आशयातून रविंद्रनाथ टागोर यांनी हे आंदोलन केले होते, ज्याची इतिहासात नोंद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Medical Miracle: जन्मजात कान नसूनही येणार ऐकू; केईएमच्या डॉक्टरांनी १३ वर्षीय मुलाला दिले नवजीवन

Video Viral: अहो बाई काय हा प्रकार? हॉटेलमध्ये सहा जणांनी सातव्यासोबत रंगेहाथ पकडलं, त्यानंतर जे घडलं ते भयानक होतं

भाजीत मीठ कमी का? पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत छतावरून खाली दिलं फेकून; 5 महिन्यांच्या गर्भवतीचा दुर्दैवी अंत

धक्कादायक! भाजपचे आमदारांने महिलांचे केले शोषण; तृप्ती देसाईंचा गंभीर आराेप, मुख्यमंत्र्यांकडे केली राजीनाम्याची मागणी

Pralhad Joshi: इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण, दर वाढविण्यासाठी प्रयत्न : प्रल्हाद जोशी

SCROLL FOR NEXT