राहुल गांधी 
देश

सरकार लसीसाठी नव्हे ‘ब्लू टिक’साठी भांडतेय - राहुल गांधी

नामदेव कुंभार

नवी दिल्ली : ट्विटर आणि सरकारमधील वादाने आता राजकीय वळण घेतले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींनी या वादावरून केंद्र सरकारला चिमटा काढताना म्हटले की, सरकार ‘ब्लू टिक’साठी भांडत असल्याने लसीकरणासाठी आता लोकांना आत्मनिर्भर होण्याखेरीज पर्याय उरलेला नाही.

केंद्राने सोशल मिडियासाठी जारी केलेल्या डिजिटल नियमावलीकडे ट्विटरने केलेले सपशेल दुर्लक्ष यामुळे माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने नाराजीचे संकेत दिले असताना ट्विटर कंपनीने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या ट्विटर खात्यांवरील अधिकृतपणा दर्शविणारी निळी खूण (ब्ल्यू टिक) हटविली. काही तासांनंतर ही ‘ब्लू टिक’ ट्विटरने पूर्ववत केली असली तरी केंद्र सरकारने हा प्रकार गांभीर्याने घेतला असून ट्विटरला नियमावली पालनासाठी पुन्हा एकदा आठवण करून दिली. नियम पाळा अन्यथा कारवाईला तयार राहा, असा अंतिम इशाराही दिला आहे.

या साऱ्या प्रकारावरून राहुल गांधींनी केंद्र सरकारचा प्राधान्यक्रम वेगळा आहे, अशी खिल्ली उडवली. मोदी सरकार ‘ब्लू टिक’साठी भांडत आहे. तुम्हाला कोरोना प्रतिबंधक लस हवी असेल तर तुम्हाला आत्मनिर्भर बनावे लागेल, असे खोचक ट्विट राहुल गांधींनी केले. याआधीही केंद्राच्या लसवितरण धोरणावरून राहुल गांधींनी सातत्याने टिका चालविली आहे. निष्पक्ष धोरणाचा अभाव असल्यामुळेच लसीचे योग्य वितरण होत नसल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ward Structure: पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर; राजकीय सोय बघून प्रभागांमध्ये बदल?

Uddhav Thackeray : संघटनात्मक बांधणी भक्कम केल्याशिवाय ते जिंकले कसे, आपण हरलो कसे याची उत्तरे मिळणार नाहीत : उद्धव ठाकरे

Tata Capital IPO: 'टाटा'च्या आयपीओचा धमाका! सामान्यांसाठी खुला होण्यापूर्वीच बड्या कंपन्यांची मोठी गुंतवणूक

Ambad News : अंबड तालुक्यातील लालवाडी तांडा नंबर 1 वर घडली दुर्दैवी घटना; तलावात पाय घसरून अकरा वर्षीय राजवीर राठोड याचा बुडून मृत्यू

Latest Marathi News Live Update: शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काँग्रेस आक्रमक, तहसीलदारांसोबत बाचाबाची

SCROLL FOR NEXT