Randeep Singh Surjewala And Narendra Modi
Randeep Singh Surjewala And Narendra Modi esakal
देश

मोदी सरकार व भाजप राहुल गांधींना घाबरले कारण... : रणदीप सुरजेवाला

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : अखेर मोदी सरकार व भाजपच्या निशाण्यावर राहुल गांधी आणि काँग्रेस का आहे? ईडीची कारवाई काय जनतेचे प्रश्न उठवणाऱ्यांचा आवाज दाबण्याचे षडयंत्र आहे का? केवळ राहुल गांधी यांच्यावर इतके हल्लेखोर का आहेत? या प्रश्नांची उत्तरे देशाने जाणून घेणे आवश्यक असल्याचे काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala) यांनी सांगितले. दिल्ली येथील पत्रकार परिषदेत ते आज मंगळवारी (ता.१४) बोलत होते. (Randeep Surjewala Says, Modi Government And BJP Fear Rahul Gandhi)

सलग दुसऱ्या दिवशी नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली. त्यामुळे काँग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मोदी सरकार व भाजप राहुल गांधी व काँग्रेसला घाबरतात कारण जेव्हा चीनने आपल्या भूभागावर नियंत्रण मिळविले आणि आमचे जवान शहीद झाले, तेव्हा पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi) सर्वपक्षीय बैठकीत म्हणाले होते, की आपल्या भूभागात कोणीही घुसखोरी केलेली नाही आणि प्रवेश केलेला नाही.

त्यावेळी राहुल गांधी यांनी हा खोटेपणा ओळखला आणि देशासाठी आवाज उठवला, असे सुरजेवाला म्हणाले. महागाईने जनता त्रस्त आहे. त्यावरुन राहुल गांधी सतत सरकारला घेरत असून सरकारकडे उत्तर नाही. त्यामुळे राहुल गांधी यांच्यावर सरकार नाराज असल्याचा आरोप रणदीप सुरजेवाला यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT