Lalu Prasad esakal
देश

नितीश सरकार कोसळून लवकरच राजदची सत्ता येणार; लालूंचा दावा

सकाळ डिजिटल टीम

पाटणा : बिहारमधील मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकार लवकरच कोसळणार असून ७५ आमदारांच्या संख्याबळाचे राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) सरकार सत्तेत येईल, असा दावा पक्षाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी बुधवारी केला.

‘राजद’च्या २५ व्या वर्धापन दिनाच्या पक्षाच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी लालूप्रसाद यांनी केंद्र सरकारवरही टीका केली. ते म्हणाले, ‘‘गरिबांना अन्नधान्य देत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यूपीए सरकारने गरिबांना अन्नधान्य देण्यास प्रारंभ केला. केंद्र सरकार हे देशावरचे ओझे झाले आहे.’’

नुकत्याच झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीतील पराभवाबाबत ते म्हणाले, ‘‘या पराजयातही आमचा विजय आहे. राज्य सरकारच्या अप्रामाणिकतेचा तिथे विजय झाला. मात्र यामुळे सत्य बदलणार नाही. येत्या काही दिवसांत नितीशकुमार सरकारची गच्छंती होणार, हेच सत्य आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चालत्या विमानात प्रवाशाने उघडलं इमर्जन्सी गेट, अलार्म वाजताच पायलटने... धक्कादायक घटनेनं खळबळ

SRH vs KKR: सुनील नरेनचे इतिहास घडवला, 'असा' पराक्रम करणारा पहिलाच ठरला! हैदराबादचा संघ कोलकातासमोर १७० च्या आत ऑलआऊट

"तिने मला ओळखच दाखवली नाही" अश्विनी भावेंवर महेश टिळेकरांनी व्यक्त केली नाराजी "मी सुद्धा रुबाब दाखवू शकतो"

IPL 2026 नंतर मुंबई इंडियन्स रोहित शर्माला मुक्त करणार? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय? जाणून घ्या...

Mumbai News: पुनर्विकासात मोठा गेमचेंजर! वरच्या मजल्यावरील रहिवाशांना घर मिळणार, पण अट तळमजल्याच्या पात्रतेची

SCROLL FOR NEXT