Lalu Prasad esakal
देश

नितीश सरकार कोसळून लवकरच राजदची सत्ता येणार; लालूंचा दावा

सकाळ डिजिटल टीम

पाटणा : बिहारमधील मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकार लवकरच कोसळणार असून ७५ आमदारांच्या संख्याबळाचे राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) सरकार सत्तेत येईल, असा दावा पक्षाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी बुधवारी केला.

‘राजद’च्या २५ व्या वर्धापन दिनाच्या पक्षाच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी लालूप्रसाद यांनी केंद्र सरकारवरही टीका केली. ते म्हणाले, ‘‘गरिबांना अन्नधान्य देत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यूपीए सरकारने गरिबांना अन्नधान्य देण्यास प्रारंभ केला. केंद्र सरकार हे देशावरचे ओझे झाले आहे.’’

नुकत्याच झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीतील पराभवाबाबत ते म्हणाले, ‘‘या पराजयातही आमचा विजय आहे. राज्य सरकारच्या अप्रामाणिकतेचा तिथे विजय झाला. मात्र यामुळे सत्य बदलणार नाही. येत्या काही दिवसांत नितीशकुमार सरकारची गच्छंती होणार, हेच सत्य आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: निवडणुकीआधी काँग्रेसचा मास्टरस्ट्रोक! मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; बेस्टच्या कायापालटासाठी मांडली ठोस योजना

Nashik Cyber Fraud : सावधान नाशिककर! वर्षभरात सायबर भामट्यांनी मारला ५७ कोटींवर डल्ला; शेअर मार्केटच्या नावाने सर्वाधिक लूट

UPI Payment Tips : UPI पेमेंट करताना सावध! या सुरक्षा टिप्स दुर्लक्ष केल्यास खातं होऊ शकतं रिकामं!

Blue Drum : चर्चेतील मेरठ हत्याप्रकरणावर आधारित डॉक्यू-सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Motorola Viral News : मोटोरोला मोबाईल ब्लास्टवर कंपनीकडून अधिकृत स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT