chirag 
देश

'सात निश्चय योजना' हा बिहारच्या इतिहासातील सर्वांत मोठा घोटाळा; चिराग पासवानांचा नितीश कुमारांवर हल्लाबोल

सकाळवृत्तसेवा

पाटणा : लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी आज शुक्रवारी नितीश कुमार यांच्यावर टीका केली. नितीश कुमार यांची 'सात निश्चय योजना' ही बिहारच्या इतिहासातील सर्वांत मोठा घोटाळा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

ही तर फक्त सुरवात आहे. जे कुणी सात निश्चय योजनेशी निगडीत आहेत त्यांचा तपास केला जाईल आणि योग्य कारवाईदेखील केली जाईल. मी हे सतत म्हणत आलोय की सात निश्चय योजना ही बिहारच्या इतिहासातील सर्वांत मोठा घोटाळा आहे आणि त्याचा व्यवस्थितरित्या तपास व्हायला हवा. याचा तपास होईल या भीतीतच ते आहेत. आम्ही फक्त याच्या तपासाबाबत बोलतोय तर नितीश कुमार का घाबरत आहेत? चिराग पासवान यांनी मुंगेर फायरिंग घटनेबाबतही प्रतिक्रीया दिली आणि त्यांनी या घटनेसाठी नितीश कुमारांना जबाबदार ठरवलं. 

 त्यांनी म्हटलं की, या प्रकारच्या घटना बिहारमध्ये वाढल्या आहेत. जमूई या माझ्या लोकसभा मतदारसंघातही याप्रकारच्या घटना घडल्या आहेत. जिथे राज्याचे मुख्यमंत्रीच जातीव्यवस्थेच्या विचारात मग्न असतील तिथे आपण दुसरं काय अपेक्षित तर करु शकतो? व्होट बँक पॉलिटीक्स करण्याचा हा प्रयत्न आहे. कुणीतरी आदेश दिलाच असेल आणि म्हणूनच याला मुख्यमंत्री नितीश कुमारच जबाबदार आहेत. 

गुरुवारी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने 15 कंत्राटदारांवर छापे टाकले आहेत जे जल नल योजनेशी निगडीत आहेत. 2015 च्या विधानसभा निवडणुकीआधीच नितीश कुमारांनी 2.7 लाख कोटी रुपयांची सात निश्चय योजना जाहीर केली होती. वीज, सांडपाण्याची विल्हेवाट, संडास, पिण्याचे पाणी, रस्ते आणि शेतीला पाणी असे काही महत्त्वाचे मुद्दे या योजनेअंतर्गत होते. नितीश कुमारांनी ही निवडणुक राजद-काँग्रेससोबत लढवली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारला जाहीर केलेल्या 1.25  लाख कोटी रुपयांच्या योजनेला शह देण्यासाठी म्हणून नितीश कुमारांनी ही योजना जाहीर केली होती. 

चिराग पासवान यांची लोकजनशक्ती पार्टी ही एनडीएचाच भाग होती. मात्र, नितीश कुमारांच्या जेडीयूशी असलेले मतभेद पुढे करत लोजपाने राज्यात एनडीएपासून फारकत घेऊन निवडणुका लढवण्याचा पवित्रा घेतला आहे. असं असलं तरीही केंद्रात एनडीएशीच संगनमत कायम ठेवलं असून चिराग पासवान मोदींचे समर्थन करत स्वत:ला 'मोदींचे हनुमान' म्हणवून घेतात. विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 55.69 टक्के लोकांनी मतदान केले आहे जे 2015 च्या टक्केवारीहून अधिक आहे. या निवडणुकीचे निकाल 10 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: द. आफ्रिकेच्या मारिझान कापने झुलन गोस्वामीचा विश्वविक्रम मोडला! सेमीफायनलमध्ये ५ विकेट्स घेत घडवला इतिहास

एसटी बसमधून एमडी ड्रग्ज घेऊन येणारा मोहम्मद अझहर कुरेशी सोलापुरात जेरबंद! सापळा रचून बस स्थानकावर पकडले; पुरवठादारास व्हॉट्‌सॲप कॉलवरून करायचा संपर्क

Nilesh Ghaywal : गुंड घायवळ लंडनमध्ये; यूके हायकमिशनची माहिती, प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला गती

Kalyan Crime: दोन वर्षांच्या चिमुकलीवर कल्याण पोलिसांनी दाखल केला गुन्हा; खुनाचा प्रयत्न केल्याचा ठपका

Women's World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच मिळवलं फायनलचं तिकीट! इंग्लंडचा सेमीफायनलमध्ये उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT