देश

पृथ्वीराज चव्हाण म्हणतात, हीच ती वेळ

उमेश बांबरे

सातारा : विविध राज्यात लोकशाही पध्दतीने निवडल्या गेलेल्या काँग्रेसची सरकारे पाडण्यासाठी भाजप साम, दाम, दंड भेद याचा वापर करत आहे. त्यामुळे विरोधात बोलण्याची व लोकशाही वाचाविण्याची वेळ आली आहे, अशी टिका माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. 
कृष्णा नदीवर नवीन पूल; 13 कोटी मंजूर
 
आमदार चव्हाण यांनी याबाबत व्टिटरवर केवळ आपले मतच मांडलेले नाही तर भाजपवर सडकून टीका केली आहे. ते म्हणतात भाजपच्या या भुमिकेमुळे लोकशाहीच अडचणीत आली आहे. राज्यांमध्ये लोकशाही पध्दतीने निवडलेली काँग्रेसची सरकारे पाडण्यासाठी भाजप साम, दाम, दंड, भेद याचा वापर करत आहे. देशातील प्रत्येक संभाव्य संस्था ताब्यात घेण्याचा त्यांचा डाव आहे. त्यामुळे आता याविरोधात भुमिका घेण्याची आणि लोकशाही वाचविण्याची वेळ आली आहे.

सातारा काेणती दुकाने सुरु राहणार अन् काय बंद राहणार वाचा सविस्तर
 
दरम्यान, सत्ता आणि पैशाचा गैरवापर करून भाजप विविध राज्यातील विरोधी पक्षांची सरकारे पाडण्याचा प्रयत्न करत आहे. राजस्थानमध्ये भाजप लोकशाहीची हत्या करू पाहत आहे. भाजपकडून काँग्रेसची सुरू असलेली मुस्कटदाबीविरोधात काँग्रेसचे सर्वच नेते सक्रिय झाले आहेत. भाजपाच्या या प्रवृत्तीच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने आज (साेमवार, ता. 27) मुंबईतील राजभावनासमोर धरणे आंदोलन करण्यात येत असल्याचे चव्हाण यांनी नमूद केले आहे. 

Edited By : Siddharth Latkar

सातारा पोलिस दलावर कोसळला दुःखाचा डोंगर

प्रकल्प नको तर, जनतेला सेना नको  कोणी दिला इशारा वाचा....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Ashadhi Ekadashi : "बा विठ्ठला, राज्यातील प्रत्येक शेतकरी सुखी राहू दे..."; शासकीय महापूजेनंतर CM फडणवीसांचे पांडुरंगाला साकडे

Ashadhi Ekadashi Mahapuja : '20 वर्षे एकही वारी चुकवली नाही...'; मुख्यमंत्री फडणवीसांसोबत शासकीय महापूजेचा कोणाला मिळाला मान? धाराशिवमधील शेतकरी दाम्पत्य आहे तरी कोण?

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : CM देवेंद्र-अमृता फडणवीसांच्या हस्ते विठूरायाची महापूजा; मुख्यमंत्र्यांनी काय मागितलं मागणं?

Pandharpur Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न; धाराशिवच्या शेतकरी दाम्पत्याला मिळाला 'मानाचा वारकरी' होण्याचा बहुमान

Pandharpur Ashadhi Wari : पंढरपुरात वैष्णवांचा मेळा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहाटे पार पडणार शासकीय महापूजा, 20 लाख भाविक दाखल

SCROLL FOR NEXT