Rahul Gandhi Team eSakal
देश

अन्नदात्याने सत्याग्रह करत अहंकाराला झुकवलं - राहुल गांधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला.

सुधीर काकडे

केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांना (Farmers Protest) होणाऱ्या विरोधानंतर आज केंद्र सरकारने अखेर कृषी कायदे मागे घेतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: ही घोषणा केली असून, लवकरच त्यांनी याबद्दल संविधानीक प्रक्रिया पुर्ण करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर देशभरातून याबद्दल वेगवेळ्या प्रतिक्रिया समोर येत असून, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज या निर्णयानंतर शेतकऱ्यांचं अभिनंदन केलं आहे.

"देशाच्या शेतकऱ्यांनी केलेल्या सत्याग्रहासमोर अहंकारला झुकवलं आहे. अन्यायाच्या विरोधात झालेल्या या विजयाच्या शुभेच्छा! जय हिंद, जय हिंद का किसान" असं म्हणत राहूल गांधी यांनी या निर्णयाबद्दल माहिती दिली. राहुल गांधी यांनी आपला एक जुना व्हीडिओ शेअर करत या भावना मांडल्या आहेत. या व्हीडिओमध्ये राहुल गांधी म्हणताय की, "माझे शब्द लक्षात ठेवा की सरकारला हा कायदा मागे घ्यावा लागेल." त्यामुळे आता त्यांनी हा कायदा मागे घेतल्यानंतर राहुल गांधींकडून या शेतकऱ्यांचं अभिनंदन करण्यात आलं.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी हा निर्णय घेतला. देशवासीयांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूनानक जयंतीचं औचित्य साधून देशवासीयांची माफी मागत हा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! , सरकारने 'त्या' महिलांना योजनेचा लाभ देणे केले बंद

Shubman Gill Video: इंग्लंडच्या गोलंदाजाने केला गिलचा फोकस हलवण्याचा प्रयत्न; मग भारताच्या कर्णधारानं काय केलं पाहाच...

Shiv Yog 2025: उद्या शिवयोगाचा दुर्मिळ योग, धनु राशीसह 5 राशींवर माता लक्ष्मीची राहील कृपादृष्टी

BPSC Clerk Recruitment: 12वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी! BPSC मार्फत क्लार्क पदासाठी भरती जाहीर; जाणून घ्या पगार किती मिळेल?

निलेश साबळे 'चला हवा येऊ द्या २' मध्ये का दिसणार नाही? खरं कारण समोर, म्हणाला, 'गेले सहा महिने...

SCROLL FOR NEXT