सत्यपाल मलिक Sakal
देश

पंतप्रधान म्हणाले शेतकरी माझ्यासाठी मेले का : सत्यपाल मलिक

शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावरून मी पंतप्रधानांना भेटायला गेलो होतो पण आमची शाब्दिक चकमक होऊन बैठक पाच मिनिटांमध्ये संपल्याचे मलिक यांनी पत्रकारांना सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली-चंडीगड : मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांचे भाजप (BJP) नेतृत्वावरील हल्ले सुरूच असून आज त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधताना त्यांना ‘उद्धट’ असे म्हटले आहे. ‘शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावरून मी पंतप्रधानांना भेटायला गेलो होतो पण आमची शाब्दिक चकमक होऊन बैठक पाच मिनिटांमध्ये संपल्याचे मलिक यांनी पत्रकारांना सांगितले.

हरियानातील दादरी येथील कार्यक्रमात ते म्हणाले की, ‘‘ शेतकऱ्यांच्या मुद्यावरून मी पंतप्रधान मोदी यांना भेटायला गेलो तेव्हा पाच मिनिटांमध्ये माझा त्यांच्याशी वाद सुरू झाला. मोदी खूप घमेंडीत बोलत होते. या आंदोलनामध्ये पाचशे लोक मरण पावल्याचे मी त्यांना सांगितले तेव्हा ते म्हणाले की ते शेतकरी काही माझ्यासाठी मेले आहेत का? यावर मी देखील त्यांना तुमच्यासाठीच ते मेले असल्याचे सांगितले.

तुम्ही राजा होऊन बसले आहात असे मी त्यांना सुनावले. यानंतर माझे त्यांच्याशी भांडण झाले. त्यामुळे त्यांनी मला अमित शहा यांना भेटायला सांगितले नंतर मी शहांना देखील भेटलो.’’ शेतकऱ्यांच्या इतर सगळ्याच गोष्टी बिघडून टाकण्याऐवजी त्यांच्या मालाला किमान हमी भाव देणे गरजेचे असल्याचेही मलिक यांनी स्पष्ट केले.

अन्यथा मोदी, शहांनी माफी मागावी : सुरजेवाला

मलिक यांनी पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरून काँग्रेसने मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना लक्ष्य केले. मलिक खोटे असतील तर त्यांना बडतर्फ करावे, अन्यथा मोदी-शहांनी शेतकऱ्यांची माफी मागावी, असे खुले आव्हान काँग्रेसने दिले आहे. मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा हरियानातील चरखी दादरी येथील कार्यक्रमातील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात मलिक यांनी शेतकरी आंदोलनाबाबत पंतप्रधानांशी झालेल्या भेटीवरून खळबळजनक विधाने केली आहेत.

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मलिक यांच्या खुलाशावरून मोदींचा शेतकरी विरोधी चेहरा देशासमोर आला आहे, अशी टीका केली. संपूर्ण देश यामुळे आश्चर्यचकित झाला असून पंतप्रधानांच्या अहंकाराचे, शेतकरीविरोधी मानसिकतेचे यापेक्षा दुसरे ज्वलंत उदाहरण नाही. आता स्वतः मोदींनी समोर येऊन सांगावे की त्यांनी मलिकांसमोर अन्नदात्याला अपमानित केले आहे. शेतकरी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी प्राण सोडत असताना मोदी भांडवलदारांसाठीच्या योजना आखत होते, असा टोलाही सुरजेवाला यांनी लगावला.

शेतकऱ्यांशी संबंधित असंख्य विषय अजूनही प्रलंबित आहेत. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांविरोधातील गुन्हे तातडीने मागे घेणे गरजेचे आहे. सरकारने याबाबत किमान प्रामाणिकपणा दाखवावा. किमान हमीभावाला कायदेशीर अधिष्ठान मिळायला हवे.

-सत्यपाल मलिक, राज्यपाल मेघालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Pune News: रेल्वे चालकाला सात किलोमीटर आधीच दिसणार सिग्नल; प्रवाशांना सुरक्षेचे ‘कवच ४.०’, २५० किमीवर यशस्वी चाचणी!

Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

SCROLL FOR NEXT