देश

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर काय म्हणाले, काँग्रेस नेते शशी थरूर? 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : संसदेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यास हा महंमद अली जीना यांच्या विचारसरणीचा महात्मा गांधी यांच्या विचारसरणीवरील विजय असेल, असे मत कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी आज व्यक्त केले. धर्माच्या आधारावर नागरिकत्व बहाल करणे म्हणजे भारताला "पाकिस्तानची हिंदुत्व आवृत्ती' बनविण्यासारखे आहे, अशी टीका थरूर यांनी केली. 

'पीटीआय'ला दिलेल्या मुलाखतीत खासदार शशी थरूर यांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर (कॅब) टीका केली. "भाजप सरकारला एका समुदायाला वेगळे पाडायचे आहे. या समुदायातील नागरिकांना कोणताही आश्रय दिला जाणार नाही. दोन्ही सभागृहांमध्ये हे विधेयक मंजूर झाले तरी सर्वोच्च न्यायालय राज्यघटनेचा असा भंग होऊ देणार नाही. या विधेयकावर चर्चाही न करण्याचे सरकारचे धोरण निर्लज्जपणाचे आहे.'' 

आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार आवश्‍यक असलेल्या कोणतीही मूलभूत प्रक्रिया न पाळता सरकार हे विधेयक आणू पाहत आहे, अशी टीकाही थरूर यांनी केली.

"केंद्र सरकारचे हे धोरण म्हणजे सरळसरळ एका समुदायाला वेगळे पाडण्याचा डाव आहे. कॉंग्रेस पक्षाचाही याला निश्‍चितच विरोध असेल. पाकिस्तानची निर्मिती धर्माच्या आधारावरच झाली होती. आता भारतालाही त्याच वाटेवर नेले जात आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, मौलाना अब्दुल कलाम आझाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीचा पराभव झाल्यासारखे होईल,' असे थरूर म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Janhvi Kapoor: मराठी कलाकारांच्या मुस्काडात... गांधी-आंबेडकरांवरील जान्हवीच्या 'त्या' विधानानंतर किरण मानेंची पोस्ट व्हायरल

Loksabha Election 2024 : राजधानीत मोदी विरुद्ध केजरीवाल लढत; दिल्लीत आज मतदान

Bankura Loksabha Election : कम्युनिस्टांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा प्रभाव

Sharad Pawar : दुष्काळाबाबत सरकार गंभीर नाही

SSC HSC : दहावी-बारावीची ग्रेड पद्धत होणार बंद

SCROLL FOR NEXT