shiv sena leader arvind sawant resigns as central minister quits with nda 
देश

शिवसेना एनडीएतून बाहेर; अरविंद सावंत यांचा राजीनामा सुपूर्द 

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्ता समीकरणे बदलत असताना शिवसेनेने केंद्रातील एनडीए सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या संदर्भात केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांनी सकाळीच आपण राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले होते.

काय म्हणाले सावंत? 
दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत अरविंद सावंत यांनी म्हणाले, 'देशाचा मंत्री म्हणून शपथ घेतली होती. पंतप्रधानांनी मला केंद्रीय अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम खात्याची जबाबदारी दिली होती. आज, महाराष्ट्राच्या राजकारणात विश्वासार्हतेला तडा गेला. सत्तेच्या समान वाटपाचा निर्णय सहमतीन झाला. पण, आता ते नाकारण्यात आलं. शिवसेनेला खोटं ठरवण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळं विश्वासार्हता नाही. अशा वातावरणात मी केंद्रात काम करणं योग्य नाही. ते नैतिकदृष्ट्याही योग्य नाही. मी आज, माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठविला आहे.' पत्रकार परिषदेनंतर सावंत यांनी सर्व पत्रकारांना राजीनाम्याचे पत्र दाखवले. 

सावतं यांचे ट्विटस् 
अरविंद सावंत यांनी सकाळीच ट्विटरवरून आपली भूमिका स्पष्ट केली होती. लोकसभा निवडणुकीपूर्वीच सत्ता वाटपाचा फॉर्म्युला ठरला होता. तो दोन्ही पक्षांनी मान्य केला होता. तो नाकारून शिवसेनेला खोटे ठरवण्याचा प्रयत्न झाला. शिवसेनेला खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला. पण, शिवसेनेची बाजू सत्याची आहे, अशी भूमिका सावंत यांनी मांडली. शिवसेनेला खोटं ठरवणं हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानास कलंक लावणारा प्रकार आहे, असं सावंत यांनी म्हटलं होतं. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Alert: मुंबईत पावसाची रिपरिप सुरूच, पुढील काही दिवस अलर्ट जारी; हवामान विभागाची महत्त्वाची माहिती

आशीष शेलार आमच्या सोबत या! उद्धव ठाकरेंनी केलं शेलारांचे कौतुक, फडणवीसांना ठरवलं पप्पू?

६० व्या वाढदिवसाला शाहरुख मन्नतबाहेर आलाच नाही; पोस्ट करत सांगितलं कारण, म्हणाला, 'माफी मागतो पण...

अर्ध शरीर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा मदतीसाठी टाहो, बाजूला २० मृतदेह पडलेले; घटनास्थळी हादरवणारं दृश्य

Latest Marathi News Live Update : पुणे-बेंगळुरू महामार्गावर भीषण अपघात

SCROLL FOR NEXT