muslim Sakal
देश

"समान नागरी कायदा आणि मदरसे बंद करणं मुस्लिमांच्या फायद्याचं"

भाजपाचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमात हे विधान केलं आहे.

वैष्णवी कारंजकर

भारताला राज्यांचा संघ म्हणून राहुल गांधी अप्रत्यक्षपणे फुटीरतावादी घटकांना प्रोत्साहन देत आहेत, अशी टीका आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी काल केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमात बोलताना ते असंही म्हणाले की, जे मदरसे बंद करतायत आणि समान नागरी कायद्याबद्दल बोलतायत ते मुस्लिमांचे हितचिंतक आहेत. (BJP Assam Chief Minister Himanta Biswa Sarma in RSS Event)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (Rashtriya Swayamsevak Sangh) पंचजन्य आणि ऑर्गनायझर या नियतकालिकांना ७५ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने दिल्लीमध्ये एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात हिमंता बिस्वा सर्मा बोलत होते. ते म्हणाले, "जर भारत हा राज्यांचा संघ असेल तर ५००० वर्षांच्या समृद्ध इतिहासाचं का? जेव्हा काँग्रेस स्वतःला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणवतं आणि देशभरात सभा, बैठका घेतं, तेव्हा त्यांचा अर्थ राज्यांचा संघ असा असतो का? देशाला राज्यांचा संघ म्हणून राहुल गांधी (Rahul Gandhi) देश तोडण्याची भाषा करत आहेत. अप्रत्यक्षपणे ते इथल्या फुटीरतावादी शक्तींना प्रोत्साहन देतायत. पण हा त्यांचा दोष नाही. त्यांनी कदाचित जेएनयूमधल्या कोणाकडून तरी शिकवणी घेतली असेल".

सर्मा यांनी आपल्या राज्यातले सरकारी अनुदानित मदरसे (Madarsa) बंद केले, त्याबद्दल ते म्हणाले की,जर त्यांना शिक्षणात प्रगती करायची असेल तर मुस्लिमांनी मदरश्यांपासून दूर व्हायला हवं. तुम्हाला जर धर्म शिकवायचा असेल तर ते तुमच्या घरी शिकवा. शाळेत तुम्ही फक्त विज्ञान आणि गणितच शिकायला हवं. मदरसे बंद करणं आणि समान नागरी कायदा लागू करणं हे मुस्लिमांच्या फायद्याचं आहे. आम्हाला हे हिंदुत्वासाठी करण्याची गरज नाही. जे अशी मागणी करतात, त्यांना भारतीय मुस्लिमांनी आपला मित्र मानायला हवं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Reaction On Bihar Voting : बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील विक्रमी मतदानावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया आली समोर, म्हणाले...

Bus and Milk Tanker Accident : बस अन् दुधाच्या टँकरची समोरासमोर धडक; एका मुलासह तिघांचा मृत्यू, १७ प्रवासी जखमी

पुणे ते छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेसवे प्रकल्पाला वेग; तीन टप्प्यात पूर्ण होणार, वैशिष्ट्ये काय आहेत?

Bihar Election 2025 Voting : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ऐतिहासिक मतदान!

Akola Raid : लाच घेताना महिला लिपिक रंगेहात पकडली; अकोला एसपी कार्यालयात एसीबीचा छापा!

SCROLL FOR NEXT