India's Sea Ship esakal
देश

India's Sea Ship : अवकाश भेदून झालं आता भारत समुद्र भेदण्याच्या तयारीत, येतंय भारताचं समुद्रयान

आकाशनंतर आता भारत समुद्रात संशोधन सुरू करण्याच्या तयारीत

सकाळ डिजिटल टीम

India Samudrayan : आकाशनंतर आता भारत समुद्रात संशोधन सुरू करण्याच्या तयारीत आहे. समुद्रयानमुळे हे शक्य होणार आहे. भारताची ही दुसरी महासागर मोहीम आहे, ज्याअंतर्गत खोल समुद्रात मानवयुक्त पाणबुडी पाठवली जाईल. हा भारताचा एक अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. भारताने 2021 मध्ये समुद्रयान मोहीम सुरू केली आहे, परंतु ही मोहीम त्यापेक्षा खूप मोठी आणि तपशीलवार आहे. समुद्रातील गुपित जाणून घेण हा या मोहिमेचा उद्देश आहे.

समुद्रयान या मेगा प्रोजेक्ट अंतर्गत भारत 'मत्स्य 6000' पाणबुडी तयार करत आहे. मार्च 2024 पर्यंत त्याचे काम पूर्ण होईल आणि 2026 पर्यंत त्याचा वापर सुरू होईल, असा विश्वास आहे. या संपूर्ण मोहिमेचे नाव समुद्रयान आहे, ज्यामध्ये तीन लोकांना समुद्राच्या 6000 मीटर खाली पाठवले जाईल.

समुद्राच्या रहस्यांचा शोध घेण्याचा उद्देश

ऑक्टोबर 2021 मध्ये 'समुद्रयान' या अनोख्या महासागर मोहिमेचा शुभारंभ केल्यामुळे, भारत अमेरिका, रशिया, जपान, फ्रान्स आणि चीन सारख्या देशांच्या एलिट क्लबमध्ये सामील झाला आहे. आता भारताने समुद्रयान या महासागर मोहिमेला सुरुवात केली आहे, त्याचा उद्देश 6000 मीटर खाली खोल पाण्यात जाऊन त्याचा अभ्यास करणे आणि समुद्रातील रहस्ये जाणून घेणे हा आहे. त्यासाठी तज्ज्ञांची एक टीम समुद्रात पाठवण्यात येणार असून, त्यात 50 जणांचा समावेश असेल.

मिशनचे उद्दिष्ट काय आहे?

समुद्रयान मोहिमेचे उद्दिष्ट खोल समुद्रातील रहस्ये शोधण्याचे आहे, ज्यासाठी शास्त्रज्ञ सेन्सर्स आणि उपकरणांच्या संचासह समुद्रात 6000 मीटर खोलीवर जातील, यासाठी स्वयंचलित आणि मानवयुक्त सबमर्सिबल विकसित केले जात आहेत. हे आपत्कालीन परिस्थितीत 96 तास पाण्यात राहू शकेल.

सागरी मोहीम का आवश्यक आहे

महासागरांनी जगाचा 70 टक्के भाग व्यापला आहे, विशेष म्हणजे यातील सुमारे 95 टक्के खोल महासागर अज्ञात आहेत. भारतासाठी हे महत्त्वाचे आहे कारण भारत तीन बाजूंनी समुद्राने वेढलेला आहे. येथील 30 टक्के लोकसंख्या फक्त किनारपट्टी भागात राहते. याशिवाय मत्स्यव्यवसाय, मत्स्यपालन, पर्यटन, उपजीविका यांचेही अवलंबित्व समुद्रावर आहे.

याचा भारताला कसा फायदा होईल?

भारत सरकारचा 'न्यू इंडिया'चा दृष्टीकोन सागरी अर्थव्यवस्थेला विकासाच्या दहा प्रमुख आयामांपैकी एक मानतो. त्यामुळेच भारताने केलेल्या तयारीनुसार ही मानवयुक्त पाणबुडी शास्त्रज्ञांना थेट समुद्राच्या खोलवर घेऊन जाईल आणि तिथले घटक, खनिजे यांची माहिती देईल ज्यांचा यापूर्वी शोध लागला नाही.

किंमत काय आहे

भारत महासागर मोहीम समुद्रयानची किंमत सुमारे 4077 कोटी रुपये आहे, ज्यामध्ये 3 वर्षांसाठी म्हणजे 2021 ते 2024 पर्यंत अंदाजे खर्च अंदाजे 2834 कोटी रुपये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar Crime : पत्नी-पतीचा वाद; अकरावर्षीय मुलाला पळविले, पतीसह त्याच्या तीन मित्रांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : मराठवाड्यात पीक कर्जवाटपाचा वेग मंदावला

Software Engineer Cyber Crime Scam : सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणी ठरली सायबर फसवणुकीची शिकार; 50 लाखाला फसविले, मैत्रिणीलाही ओढले जाळ्यात

Chhatrapati Sambhajinagar Crime : तू मेरी नहीं तो किसी और की भी नहीं...

Gold Rate Today : सोनं-चांदी कोसळली! जानेवारीत पहिल्यांदाच एवढी मोठी घसरण, पाहा आजचे भाव

SCROLL FOR NEXT