supreme court asks central and maharashtra government on flood relief 
देश

पूरग्रस्तांच्या मदतीवरून सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारले

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : सांगली-कोल्हापुरातील पूरग्रस्तांना योग्य मदत न केल्याच्या कारणावरून आज, सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि महाराष्ट्र सरकारला फटकारलंय. सरकारनं मदतीची केवळ घोषणाचं केल्याचं न्यायालयाचं म्हणणं आहे. 

या संदर्भात न्यायालयाने म्हटले आहे की, सांगली-कोल्हापुरातील नद्यांना प्रलयकारी पुराचा फटका बसला होता. त्या पुराचा फटका बसलेल्यांना महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने मदत करणे अपेक्षित होते. राज्य सरकारनं त्या आपत्तीला तोंड देण्यासाठी केंद्राकडे ६ हजार ८०० कोटी रूपयांची मागणी केली होती. केंद्राने केवळ ९०० कोटी रूपये देण्याची तयारी दर्शविली आहे. याप्रकरणी म्हणणे मांडण्यासाठी न्यायालयाने सरकारला चार आठवड्यांची मुदत दिली आहे. या मुदतीत जर, सरकारनी उत्तर दिले नाही तर, तर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या मुख्य सचिवांना न्यायालयात यावे लागेल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. 

यावर्षी ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरामुळे सांगली, सातारा आणि कोल्हापुरात 45 जणांचा बळी गेला होता. महापुराचे हे संकट मानवनिर्मित होते. जवळपास 600 गावांमधील सहा लाखहून अधिक नागरिकांना याचा फटका बसला. या पूरग्रस्तांना दहा दिवसांच्या काळात अनेकठिकाणी सरकारची योग्य मदत पोहोचली नाही. तसेच त्यांच्या पुनर्वसनाची योग्य काळजी घेतली नसल्याने सर्वोच्च न्यायालयात दाखल एका याचिकेत म्हटण्यात आले आहे. सांगलीतील डॉ. अमोल पवार यांनी एड. सचिन पाटील यांच्या मार्फत ही याचिका दाखल केल्याचे डीएएनएने म्हटले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Attack on US Vice President Residence : मोठी बातमी! अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी.व्हान्स यांच्या वॉशिंग्टनमधील घरावर हल्ला

TMC Election: ठाणे महापालिकेत ‘बंडखोर फॅक्टर’! महायुती–महाविकासच्या रणनीतींना धक्का; सत्ता समीकरण बदलणार, किती उमेदवार मैदानात?

Latest Marathi News Live Update : नोटाचा अभ्यास आधी करा, पळून गेलेल्या उमेदवारांना जाब विचारा: दीपेश म्हात्रेंचा जोरदार पलटवार

Municipal Election: भिवंडी-निजामपूर पालिकेत सत्तासमीकरण बदलले! सपा गड ढासळला; काँग्रेस-भाजप-शिवसेनेची पकड मजबूत

Ravindra Chavan : "एबी फॉर्म वाटपातील चुकांची जबाबदारी माझीच"; नाशिकमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची कबुली

SCROLL FOR NEXT