Supreme_Court
Supreme_Court 
देश

धर्मांतर, काळ्या जादूविरोधातील याचिकेवर, सुप्रीम कोर्ट भडकले!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : धर्मांतर आणि काळ्या जादूविरोधात दाखल झालेल्या याचिकेमुळे सर्वोच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे. ही कोणत्या प्रकारची याचिका आहे? आम्ही तुम्हाला दंड ठोठवू शकतो. नुकसान करणारी ही याचिका आहे, अशी स्पष्ट भूमिका सर्वोच्च न्यायालयाने घेतली. याचिकेवरील नाराजीनंतर याचिकाकर्त्याने ही याचिका मागे घेतली आहे. अंधश्रद्धा, काळी जादू आणि बेकायदेशीर तसेच सक्तीने धर्मांतरावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. 

न्यायमूर्ती आर.एफ. नरिमन म्हणाले की, ''१८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीला धर्म निवडण्याची परवानगी का दिली जाऊ शकत नाही? यासाठीच संविधानामध्ये प्रचार हा शब्द वापरला गेला आहे. या याचिकेद्वारे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने बेकायदेशीर धर्मांतर आणि काळी जादू करण्याची प्रथा बंद करण्याच्या सूचना देण्यास सांगण्यात आले. भाजप नेते आणि वकील अश्विनी उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली होती.

जबरदस्तीने करण्यात येणारे धर्मांतर आणि काळ्या जादूचा वापर करण्यास बंदी घालावी, असे या याचिकेत म्हटले आहे. धर्मांतरासाठी साम, दाम, दंड, भेदाचा वापर केला जातो. हे संपूर्ण देशभरात वारंवार घडत आहे, त्यामुळे त्याला थांबवणे गरजेचे आहे. अनेक गरीब लोक याचे बळी ठरतात. विशेषत: अनुसूचित जाती आणि जमातीमधील तसेच आर्थिकदृष्ट्या मागासवर्गातील हे लोक आहेत. अंधश्रद्धा, काळी जादू आणि धर्मांतर हे घटनेच्या १४, २१ आणि २५ चे उल्लंघन करतात. 

याचिकेमध्ये म्हटले आहे की, समानता, जगण्याचा हक्क आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये यामुळे हस्तक्षेप होतो. आपली राज्यघटना ही धर्मनिरपेक्ष आहे. त्यामुळे या सर्व प्रथा या धर्मनिरपेक्ष तत्वाच्या विरोधात आहेत. 

कलम २५नुसार धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार बहाल करण्यात आला आहे. सर्व नागरिकांना त्यांचा धर्म पाळण्याचा आणि धार्मिक आचरण करण्याचा समान अधिकार आहे. मात्र, सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाही, हे पाहावे. पैशाच्या बळावर कोणतेही रुपांतर किंवा धर्मांतर केले जाऊ शकत नाही. त्यामुळे अंधश्रद्धा, काळी जादू आणि धर्मांतर हे धार्मिक स्वतंत्रतेच्या कक्षेत येत नाही, असे याचिकेमध्ये म्हटले आहे. 

तसेच सरकारही आंतरराष्ट्रीय कायद्यास बांधील आहे, ज्या अंतर्गत प्रत्येक नागरिकाचे संरक्षण करणे आणि त्याचे धार्मिक स्वातंत्र्य राखणे हे सरकारचे कर्तव्य आहे, याकडेही याचिकेद्वारे लक्ष वेधण्यात आले आहे.

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ जवळपास खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT