Tamil Nadu Accident esakal
देश

Accident News : महामार्गावर भीषण अपघात; 6 वाहनं एकमेकांवर आदळली, एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

कुड्डालोर : तामिळनाडूतून (Tamil Nadu Accident) अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. आज (मंगळवार) पहाटे त्रिची-चेन्नई राष्ट्रीय महामार्गावर सहा वाहनं एकमेकांवर आदळली आणि या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला.

या दुर्घटनेत कुड्डालोर जिल्ह्यातील वेयपूर जवळ राष्ट्रीय महामार्गावर (National Highway) 2 खासगी बस, 2 लॉरी आणि 2 कार एकमेकांवर आदळल्या. एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनेत 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. चालकासह एकाच कुटुंबातील 2 महिला आणि 2 मुलांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी सांगितलं की, मृत कुटुंबातील सदस्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. घटनेची माहिती मिळताच, पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. बऱ्याच प्रयत्नांनंतर मृतांचे मृतदेह बाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी वेयपूर शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. या अपघातप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अपघातात सहभागी असलेले लोक कोणत्या शहरातील आहेत, याचा कसून तपास पोलीस करत आहेत. अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT