PM Modi Rally Esakal
देश

PM Modi: "देशाच्या विकासासाठी दिशाहीन विरोधकांकडे कोणतीही दृष्टी नाही,’’ पंतप्रधान मोदींचा घाणाघात

Loksabha 2024: ‘‘विरोधकांच्या मनात विष आहे. ते फुटीरतेची भाषा करतात. अशी भाषा करणाऱ्यांना कायद्यापासून वाचविण्यासाठीच विरोधक एकत्र आले आहेत."

सकाळ वृत्तसेवा

PM Modi On India Alliance:

‘‘विरोधकांच्या मनात विष भरले आहे. ते अत्यंत दिशाहीन झाले असून देशाच्या विकासासाठी त्यांच्याकडे कोणतीही दृष्टी नाही,’’ अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली.

विरोधक कायम देशातील फुटीरतावादी शक्तींना बळ देतात, असा आरोपही त्यांनी केला. या लोकसभा निवडणुकीत विकसित भारताचे स्वप्न साध्य करण्यासाठी जनता राष्ट्रीय लोकशाही आघाडीला निवडून देईल, असा विश्‍वासही मोदींनी व्यक्त केला.

पंतप्रधान मोदींनी आज सकाळी मध्य प्रदेशात रोड शो घेत राज्यातील प्रचाराचा नारळ फोडला. त्यानंतर पश्‍चिम बंगालमधील जलपायगुडी येथेही सभा घेतली. नंतर बिहारमधील नवाडा येथे त्यांनी ‘एनडीए’च्या प्रचारासाठी सभा घेत ‘इंडिया’ आघाडीवर टीकास्त्र सोडले.

मोदी म्हणाले,‘‘विरोधकांच्या मनात विष आहे. ते फुटीरतेची भाषा करतात. अशी भाषा करणाऱ्यांना कायद्यापासून वाचविण्यासाठीच विरोधक एकत्र आले आहेत. या लोकांना सत्तेची हाव सुटली आहे. मात्र, त्यांना दूरच ठेवायला हवे. राममंदिराच्या उद्‌घाटनाला विरोधी पक्षांमधील काही नेते आले तर त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून काढून टाकण्यात आले. विरोधकांना सनातन धर्म संपवायचा आहे. देशाच्या विकासाची कोणतीही दृष्टी त्यांच्याकडे नाही. भारताच्या विभाजनाच्या गोष्टी ते करतात. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात तर मुस्लिम लीगची छाप आढळते.’’

पुन्हा आमचे सरकार आल्यास या लोकांची दुकाने बंद होतील अशी त्यांना भीती असल्याने ते ‘मोदी गॅरंटी’ला विरोध करत आहेत, असा दावाही मोदींनी केला.

‘तृणमूलला पैसा स्वत:साठी हवा’

जलपायगुडी पश्‍चिम बंगाल येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,‘‘केंद्र सरकारने राबविलेल्या अनेक योजनांमुळे गरिबांचे जगणे सुसह्य झाले आहे. आम्ही गरिबांना त्यांचा आत्मसन्मान मिळवून दिला. मागील दहा वर्षांतील कामगिरी हा केवळ एक छोटा नमुना आहे. आम्हाला देशाला आणखी पुढे न्यायचे आहे. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण मी समर्पित केला आहे.

केंद्र सरकार अनेक चांगल्या योजना राबवत असताना पश्‍चिम बंगालमध्ये मात्र या योजनांना ब्रेक लावण्याचे काम तृणमूल काँग्रेस करत आहे. केंद्र सरकारने गरिबांसाठी घरे बांधण्यासाठी तीस हजार कोटी रुपये पाठविले. हे पैसे लाभार्थींच्या खात्यांत जावे, असे केंद्राचे म्हणणे होते. मात्र, हे पैसे आधी आपल्या नेत्यांच्या खात्यांमध्ये जावेत, असे तृणमूलचे म्हणणे होते. मी असे होऊ देणार नाही.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : पाचोरा बस स्थानक परिसरात भरदिवसा गोळीबार

SCROLL FOR NEXT