Rajiv Kumar 
देश

"बेरोजगारीचा प्रश्न कोणत्याही सरकारकडून सुटणारा नाही"; नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचा दावा

सकाळ डिजिटल टीम

देशातील रोजगाराचा प्रश्न हा कोणत्याही सरकारकडून सुटणारा नाही, असा दावा नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार यांनी केला आहे. त्याचबरोबर रोजगारासंबंधीची सरकारची धोरणं काय आहेत? याचा खुलासाही त्यांनी केला आहे. एका मुलाखतीत ते बोलत होते. 

EPFO : भविष्य निर्वाह निधीवर मिळणार इतकं व्याज; जाणून घ्या कसा चेक करणार बॅलन्स

देशातील वाढत्या बेरोजगारीच्या समस्येवर भाष्य करताना डॉ. राजीव कुमार म्हणाले, "ही समस्या अशी आहे जी कधीही कोणत्याही सरकारकडून सुटणारी नाही. कारण रोजगाराचा जो प्रश्न आहे तो पूर्णपणे आपल्या अर्थव्यवस्थेशी, विकास दराशी, गुंतवणुकीशी संबंधीत आहे. त्यामुळे जोपर्यंत या गोष्टी सुधारत नाहीत तोपर्यंत रोजगारातही सुधारणा होणं अशक्य आहे." 

यासाठी सरकारने जे धोरण अवलंबलं आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार बोलून दाखवलं आहे. त्यांनी खासगी क्षेत्राला, खासगी गुंतवणुकदारांना आवाहन केलं आहे की त्यांनी पुढे येऊन रोजगाराच्या क्षेत्रात आपली गुंतवणूक वाढवावी. ही गुंतवणूक वाढवण्यासाठी सरकारला जे काही करावं लागेल ते सरकार करणार आहे. यासाठी खासगी गुंतवणुकदारांना सुविधा देणं, त्यांचं प्रमोशन करणं या सगळ्या गोष्टी करायला आम्ही तयार आहोत, असंही डॉ. राजीव कुमार यांनी म्हटलं आहे.  

तसेच शिक्षण क्षेत्रातून जी नवी पिढी शिकून बाहेर पडत आहे. तसेच इंजिनिअरिंग आणि मेडिकल क्षेत्रातील मुलांसाठी सरकारला काहीतरी करावं लागेल यासंबंधी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना डॉ. राजीव कुमार म्हणाले, "सरकार जास्तीत जास्त काय करु शकते, त्यांच्यासाठी एखादा बेरोजगार लाभ किंवा भत्ता देऊ शकते किंवा किमान वेतनाप्रमाणे काहीतरी सुरु करु शकते. पण यामुळे रोजगार वाढणार नाही. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की यावर कोणताही ठोस उपाय नाही. असा उपाय शोधण्याचा प्रयत्न केला तरी तो होऊ शकणार नाही. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT