Unemployment 
देश

लॉकडाउनमुळे पडलाय बेरोजगारीचा 'टॉप गिअर'; भारतातील बेरोजगारीचा दर पोहोचला...!

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : लॉकडाऊनच्या काळात राज्यराज्यांमधून स्वगृही परतणाऱ्या मजुरांचे चित्र सध्या सगळीकडे दिसते आहे. त्यावरून देशातील बेरोजगारीचे चित्र स्पष्ट होते आहे. बेरोजगारीचा 'टॉप गिअर' पडल्याचे यातून प्रतीत होते आहे.

भारतातील बेरोजगारी दर नुकत्याच सरलेल्या आठवड्यात 27.1 टक्क्यांवर पोचला आहे. त्या आधीच्या आठवड्यात तो 21.1 टक्के होता. तर एप्रिल महिन्यात बेरोजगारीचा दर 23.5 टक्के होता. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन आहे. त्यामुळे बहुतांश उद्योग-व्यवसाय ठप्प झाले आहेत. याचा फटका बसत एप्रिल अखेर आणि मे महिन्याच्या पहिल्या तीन दिवसात बेरोजगारीदर वाढला आहे. आता लॉकडाऊन 17 मे पर्यंत वाढवण्यात आलेले आहे. त्यामुळे रोजगारावर त्याचा आणखी विपरित परिणाम होणार आहे, अशी माहिती सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीचे (सीएमआयई) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी महेश व्यास यांनी दिली आहे.

12.5 कोटी लोकांनी गमावला रोजगार

सीएमआयईच्या मते, एप्रिल महिन्यात 12.5 कोटी लोकांनी रोजगार गमावला आहे. यापैकी 9.13 कोटी लोक हे असंघटित म्हणजे मजूर वर्गात आणि लहान व्यापरांकडे काम करत होते. याशिवाय 1.82 कोटी व्यावसायिकांचे व्यवसाय पूर्णपणे बंद झाले आहेत. तसेच 1.78 कोटी लोक निश्चित वेतनावर काम करत होते ते एप्रिल अखेर बेरोजगार झाले आहेत.

दिलासा देणारी बाब म्हणजे 20 एप्रिलनंतर 58 लाख लोक शेती आणि शेतीशीसंबंधित कामांमध्ये गुंतले आहेत.

दर महिन्यात वाढतोय बेरोजगारीचा आकडा:

बेरोजगारीचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. 15 मार्चपर्यंत बेरोजगारीचा दर 6.74 टक्के होता. यानंतर 19 एप्रिलपर्यंत हा दर 26.19 टक्क्यांवर पोचला. मात्र 19 एप्रिलनंतरच्या आठवड्यात बेरोजगारी दर थोडा कमी होत 21.05 टक्के झाला होता. मात्र त्यांनतर, एप्रिल अखेरपर्यंत हा दर 23.5 टक्क्यांवर पोचला. 3 मेपर्यंत हा दर 27.1 टक्क्यांवर पोचला आहे. आकडेवारीवरून स्पष्ट होते की, लॉकडाऊननंतर बेरोजगारीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

लॉकडाउनचा परिणाम प्रत्येक क्षेत्रातील संघटित आणि असंघटित कामगारांवर तसेच क्षेत्रावर झाला आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत आणखी वाढ झाल्यास रोजगाराची परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.शहरी आणि ग्रामीण या दोन्ही भागात नागरिकांनी रोजगार गमावला आहे. 

बहुतांश स्टार्ट अप कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी केले आहे. 2800 आयटी कंपन्यांची संघटना असलेल्या नॅसकॉमने देखील मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या कपातीचे संकेत दिले आहेत.

तमिलनाडू, झारखंड आणि बिहारमध्ये सर्वाधिक बेरोजगारी:

बेरोजगारीने देशातील प्रत्येक राज्यातील लोकांना प्रभावित केले आहे. मात्र देशातील मोठ्या राज्यांमध्ये तामिळनाडू आघाडीवर आहे. तसेच दुसऱ्या आणि तिसऱ्या  क्रमांक झारखंड आणि बिहारचा लागते. तामिळनाडूमध्ये बेरोजगारीचा दर 49.8 टक्क्यांवर पोचला आहे. तर झारखंडमध्ये 47.1 टक्के आणि बिहारमध्ये 46.6 टक्के आहे. पंजाबमध्ये बेरोजगारीचा दर सर्वात कमी आहे. तर त्यापाठोपाठ छत्तीसगड आणि तेलंगानाचा क्रमांक लागतो. पंजाबमध्ये बेरोजगारी दर 2.9 टक्के, छत्तीसगड 3.4 टक्के आणि  तेलंगानामध्ये बेरोजगारी दर 6.2 टक्के आहे.

रिटेल क्षेत्राचे 5.5 लाख कोटींचे नुकसान

लॉकडाऊनच्या कालावधीत वाढ झाल्याने येत्या काही महिन्यात 20 टक्के व्यवसायिकांना व्यवसाय बंद करण्याची वेळ येणार आहे, अशी माहिती व्यापारी संघटना काँफेडरेशन ऑफ ऑल इंडियाने (सीएआयटी) दिली आहे. लॉकडाऊनच्या 25 मार्च ते 30 एप्रिलच्या दरम्यान रिटेल क्षेत्राचे 5.5 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

देशातील एकूण 7 कोटी 
व्यावसायिकांपैकी 1.78 कोटी व्यावसायिकांना येत्या काही महिन्यात कायम स्वरूपी व्यवसाय बंद करावा लागण्याची शक्यता आहे. तर 1.78 कोटी व्यावसायिकांनावर अवलंबून असलेल्या 75 लाख व्यावसायिकांना नजीकच्या काळात फटका बसण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांची बिकट परिस्थिती असून बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते सुरू असून उत्पन्न मात्र घटले आहे.

केंद्र आणि राज्य सरकरांनी नॉन कॉर्पोरेट क्षेत्राकडे दुर्लक्ष केल्याचे सीएआयटीने म्हटले आहे. देशाच्या एकूण देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) या क्षेत्राचा सुमारे 40 टक्के वाटा आहे. तर देशातील एकूण मनुष्यबळाच्या एक तृतीयांश मनुष्यबळ या क्षेत्रात कार्यरत आहे.

- रिटेल क्षेत्रात 7 कोटी व्यावसायिक कार्यरत

-जीडीपीमध्ये सुमारे 40 टक्के योगदान

- देशातील एकूण मनुष्यबळाच्या एक तृतीयांश मनुष्यबळ या क्षेत्रात कार्यरत

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime : मुंबईत वन्यप्राण्यांची तस्करी उघड? जुहूत घरातून जिवंत मगरीसह कासव जप्त; २९ वर्षीय इम्रान शेख पोलिसांच्या ताब्यात

Viral Video: हायवेवर थरारक स्टंट करत होती ताई, पण क्षणात घडले असं काही की व्हिडिओ पाहून धक्का बसेल

Kolhapur Mayor Results : कोल्हापुरात महायुतीचा दबदबा! महापौरपदी भाजपच्या रुपाराणी निकम, तर उपमहापौरपदी अक्षय जरग यांची बाजी; काँग्रेसचा पराभव

चार दिवसांत पत्नी गर्भवती कशी राहू शकते? आर्मीत असलेल्या पतीची थेट हायकोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय?

Canada Work Permit Rules: कॅनडामध्ये नोकरी करायची आहे? मग 'ही' चूक करू नका, नाहीतर देश सोडावा लागेल...

SCROLL FOR NEXT