देशाचे ऐक्य धोक्यात sakal
देश

देशाचे ऐक्य धोक्यात, तुम्ही दखल घ्या

७६ विधिज्ञांचे सरन्यायाधीशांना साकडे; धर्मसंसदेतील विधानांवर व्यक्त केली चिंता

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : राजधानी दिल्ली आणि हरिद्वारमधील धर्मसंसदेतील कथित चिथावणीखोर भाषणांची दखल घेण्यात यावी, अशी विनंती देशभरातील सत्तर विधीज्ञांनी सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा यांच्याकडे केली आहे. या कार्यक्रमांत करण्यात आलेली भाषणे ही केवळ द्वेषमूलकच नाहीत तर त्यात संपूर्ण समुदायाची हत्या करण्याची उघड चिथावणी देण्यात आली आहे.

या भाषणांमुळे देशाचे ऐक्य आणि सर्वसमावेशकता याला धोकाच निर्माण झाला असून लाखो मुस्लिम नागरिकांच्या जीविताचा प्रश्न देखील निर्माण झाला असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. आताची ताजी चिथावणीखोर विधाने ही याआधी करण्यात आलेल्या विधानांच्याच शृंखलेतील असून अशा विधानांना पायबंद घालण्यासाठी तातडीने न्यायालयीन हस्तक्षेपाची गरज असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. या पत्रावर ज्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत त्यात विधिज्ञ सलमान खुर्शिद, दुष्यंत दवे आणि मिनाक्षी अरोरा यांचा समावेश आहे.

उत्तराखंड पोलिसांची कारवाई

हरिद्वार येथील धर्मसंसदेमध्ये चिथावणीखोर वक्तव्ये केल्याप्रकरणी जितेंद्र नारायण त्यागी अन्य लोकांविरोधात उत्तराखंडमधील स्थानिक पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. अशाच प्रकारच्या कार्यक्रमाचे हिंदू युवा वाहिनीने दिल्लीत आयोजन केले होते. या कार्यक्रमामध्ये देखील अल्पसंख्याक समुदायांविरोधात अशाच प्रकारची विधाने करण्यात आली होती. हरिद्वार येथील वादग्रस्त धर्मसंसदेचे आयोजन करणारे जुन्या आखाड्याचे यती नरसिंहानंदन गिरी हे पोलिसांच्या रडारवर आले आहेत.

छत्तीसगडमध्ये ‘एफआयआर’ दाखल

रायपूर : अल्पसंख्याक समुदाय आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याप्रकरणी छत्तीसगड पोलिसांनी कालिचरण महाराज यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. राज्यात सत्ताधारी असलेल्या काँग्रेसचे नेते या विधानावरून संतापले असून त्यांनी भाजपला धारेवर धरले आहे. काँग्रेसचे स्थानिक नेते प्रमोद दुबे यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती.

महाराष्ट्र सरकारही कारवाई करणार

महात्मा गांधी यांच्याविरोधात कालिचरण महाराज यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांचा मुद्दा आज राज्याच्या विधिमंडळामध्ये देखील गाजला. कालिचरण यांच्यावर तातडीने कारवाई करत त्यांना अटक केली जावी अशी मागणी अल्पसंख्याक व्यवहारमंत्री नवाब मलिक यांनी केली. यावर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही यावर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून तेच याबाबत कारवाई का करत नाही? असा प्रतिसवाल केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याची दखल घेत राज्य सरकार याबाबतचा अहवाल मागवून घेईल आणि त्यानंतर योग्य ती कारवाई करेल असे विधानसभेत सांगितले. दरम्यान कालिचरण महाराज हे अकोल्याचे रहिवासी आहेत.

काही भोंदू लोकांना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविरोधात गरळ ओकल्याने त्यांची प्रतिमा कलुषित होईल असे वाटत असेल तर त्यांचा भ्रम आहे. चिथावणीखोर वक्तव्ये करून लोकांची माथी भडकाविण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.

- भूपेश बघेल, मुख्यमंत्री छत्तीसगड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचा जपान अन् दक्षिण कोरियाला मोठा धक्का! ; २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा

Modi Government and Farmers : शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! ; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली मोठी माहिती, 'आता लवकरच...'

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

SCROLL FOR NEXT