Minister Dinesh Khatik esakal
देश

'मी दलित असल्यामुळं मला सन्मान मिळत नाही'; योगी सरकारमधील मंत्र्याचा राजीनामा

'मी दलित असल्यामुळं माझं विभागात कोणी ऐकत नाही.'

सकाळ डिजिटल टीम

'मी दलित असल्यामुळं माझं विभागात कोणी ऐकत नाही.'

योगी सरकारमधील (Yogi Government) जलशक्ती राज्यमंत्री दिनेश खाटिक (Dinesh Khatik) यांनी आपला राजीनामा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्याकडं पाठवलाय. या राजीनाम्यात दिनेश खाटिक यांनी अधिकाऱ्यांवर लक्ष न दिल्याचा आणि दलितांना योग्य सन्मान मिळत नसल्याचा आरोप केलाय.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश खाटिक यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) आणि राजभवन यांनाही राजीनामा पाठवला आहे. मी दलित (Dalit) असल्यामुळं माझं विभागात कोणी ऐकत नाही, तसंच कोणत्याही बैठकीची मला माहिती दिली जात नाही, असा आरोप राज्यमंत्री खाटिक यांनी केलाय. राज्यमंत्र्यांचा अधिकार म्हणून मला केवळ वाहनच देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, बदली प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही मंत्री खाटिक यांनी केलाय. बदलीतील घोटाळ्याबाबत खाटिक यांनी अधिकाऱ्यांकडं माहिती मागितली असता, त्यांना अद्याप माहिती देण्यात आलेली नाहीय. प्रधान सचिव पाटबंधारे यांच्यावर आरोप करत राज्यमंत्री खाटिक म्हणाले, माझं संपूर्ण बोलणं ऐकून न घेता अधिकाऱ्यांनी फोन कट केला, असं त्यांनी स्पष्ट केलं. नमामि गंगे योजनेतील भ्रष्टाचाराबाबतही त्यांनी राजीनामा पत्रात उल्लेख केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT