Yogi government esakal
देश

उत्तर प्रदेश 'अनलॉक'; रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर योगींचा निर्णय

बाळकृष्ण मधाळे

लखनऊ (उत्तर प्रदेश) : कोरोना विषाणूच्या (Coronavirus) संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत असल्याने उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) योगी सरकारने (Yogi government) रविवारपासून (22 ऑगस्ट) लॉकडाउन (Lockdown) पूर्णपणे हटवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे रविवारपासून यूपीत कोणतेही निर्बंध राहणार नसल्याचेही सरकारने स्पष्ट केलेय. त्यातच रविवारी हिंदूंचा मुख्य सण रक्षाबंधन (Rakshabandhan) देखील आहे.

कोरोना विषाणूच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत असल्याने उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने रविवारपासून लॉकडाउन पूर्णपणे हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

यूपीत लसीकरण मोहीम जोरात

उत्तर प्रदेश सरकारने म्हटले आहे, की कोविडवर नियंत्रण ठेवण्यासाठी आक्रमक ट्रेसिंग, चाचणी आणि उपचारांसह यूपीने जलद लसीकरण अधिक चांगले दर्शविले आहे. आत्तापर्यंत राज्यात 7 कोटी 1 लाख 69 हजारांहून अधिक कोविड नमुन्यांची चाचणी घेण्यात आलीय. याशिवाय 6 कोटी 24 लाखांहून अधिक लोकांना लस दिली गेली आहे. ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांची संख्या लवकरच एक कोटी पार करेल. आत्तापर्यंत देशभरात कोरोना लसीचे 57 कोटी 22 लाख 81 हजार 488 डोस देण्यात आले आहेत, त्यापैकी 12 कोटी 77 लाख 95 हजार 457 लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत.

सद्यस्थितीत यूपीत कोरोनाचे 407 रुग्ण

उत्तर प्रदेश आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गुरुवारी राज्यात 25 लोकांना कोरोनाची लागण (Coronavirus in Uttar Pradesh) झाल्याचे आढळून आले. या दरम्यान, 35 लोक बरे झाले, तर 2 रुग्णांना आपला जीव गमवावा लागलाय. उत्तर प्रदेशात आत्तापर्यंत 17.09 लाखांहून अधिक लोकांना कोविड-19 ची लागण झालीय. त्यापैकी 16.85 लाख लोक बरे झालेत, तर 22,789 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या उत्तर प्रदेशात कोविडचे 407 रुग्ण सक्रिय आहेत. उत्तर प्रदेशातील कोविडची बिघडलेली परिस्थिती पाहता, रविवारी साप्ताहिक बंद रद्द करण्यात आलाय. त्यामुळे आत्तापासूनच सर्व शहरे आणि त्यांच्या बाजारपेठांमध्ये केवळ पूर्व-निर्धारित साप्ताहिक बंद दिवसांवर सुट्टी असेल. यासंदर्भात आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी करण्यात आली आहेत.

यूपीत 15 जिल्हे कोरोनामुक्त

कोरोना काळात सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे यूपीतील जनजीवन पुन्हा पूर्वपदावर येत आहे. आज राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये एकही कोरोना रुग्ण आढळला नाही. यामध्ये अलिगढ, अमेठी, बदाऊं, बस्ती, देवरिया, फर्रुखाबाद, हमीरपूर, हरदोई, हातरस, कासगंज, महोबा, मिर्झापूर, संत कबीरनगर, श्रावस्ती आणि शामली या जिल्ह्यांचा समावेश आहे. हे जिल्हे सध्या कोरोनामुक्त आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : अजित आगरकरची शेवटची मिटींग अन् रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला; नेमकं काय शिजतंय? उद्याचा दिवस महत्त्वाचा

Woman biker hit and run: महिला रायडरला धडक देणारा कारचालक नेमका कोण? राजस्थानमधून केली अटक, व्हिडीओ झाला होता व्हायरल

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

SCROLL FOR NEXT