Manipur Violence sakal
देश

Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; संतप्त ग्रामस्थांनी छावण्या पेटविल्या; तीन जणांना जिवंत जाळल्याचा प्रकार

शस्त्र जप्तीची मोहीम युद्ध पातळीवर सुरू

सकाळ वृत्तसेवा

इंफाळ : मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना अजूनही घडत आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी शांततेचे आवाहन करूनही अनेक भागात कुकी समुदायावरची नाराजी व्यक्त होताना दिसून येत आहे.

काकचिंग जिल्ह्यातील नाराज ग्रामस्थांनी सुगनू येथे रिकाम्या असलेल्या असंख्य छावण्या पेटवून दिल्या. या छावण्यांत यूनायटेड कुकी लिबरेशन फ्रंटचे (युकेएलएफ)दहशतवादी थांबले होते. दरम्यान, तीन जणांना जिवंत जाळल्याचा प्रकार घडला असून त्यास अद्याप दुजोरा मिळाला नाही. तसेच शस्त्र जप्तीची मोहीम युद्ध पातळीवर सुरू आहे.

काकचिंग जिल्ह्यातील सेरौ येथील सुगूनचे काँग्रेस आमदार के. रणजित यांच्या निवासस्थानासह ग्रामस्थांनी किमान शंभर छावण्या पेटवून दिल्या. यावरुन ग्रामस्थांचा रोष लक्षात येतो. गेल्या दोन दिवसांपासून दहशतवादी आणि सुरक्षा दल यांच्यात अनेक ठिकाणी संघर्ष सुरू आहे.

काल रात्री झोपड्यांना आग लावण्यापूर्वी भारतीय रिझर्व्ह बटालियन आणि सीमा सुरक्षा दल तसेच राज्य पोलिसांच्या संयुक्त पथकाने ग्रामीण भागातील स्वयंसेवकासह नाजरेथ शिबिरात दहशतवाद्यांशी मुकाबला केला.

बराच काळ गोळीबार झाल्यानंतर तेथून दहशतवादी पळून गेले. त्यानंतर ग्रामस्थांनी या छावण्या पेटवून दिल्या. या छावणीत कुकी दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात होते. दुसरीकडे पश्‍चिम इम्फाळ जिल्ह्यातील के फायेंग येथेही सुरक्षा दल आणि कुकी दहशतवाद्यांत प्रचंड गोळीबार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

यावेळी कुकी दहशतवाद्यांनी चीरघर येथे घराला आग लावली. अन्य एका घटनेत लांगोल येथे देखील घरांना आगी लावण्याच्या घटना घडल्या आहेत. मणिपूरमध्ये महिनाभरापासून सुरू असलेल्या हिंसाचारात किमान ९८ जणांचा मृत्यू झाला आहे.

तर ३१० जण जखमी झाले. मणिपूरच्या हिंसाचारामुळे निर्वासित झालेल्या नागरिकांसाठी सरकारने मदत छावण्या उभारल्या आल्या आहेत. सध्या २७२ छावण्या असून त्यात ३७,४५० नागरिक राहत आहेत.

विविध ठिकाणांहून ७९० शस्त्रे जप्त

मणिपूरच्या सुरक्षा दलाकडून ठिकाठिकाणी कारवाई केली जात आहे. यात विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत लूटमार केलेले ७९० अत्याधुनिक आणि स्वयंचलित शस्त्रांत्रासह १०६४८ स्फोटके जप्त करण्यात आले. राज्यात तीन मे रोजी उसळलेल्या जातीय हिंसाचारानंतर दहशतवाद्यांनी पोलिस आणि अन्य सुरक्षा दलाकडून शस्त्रे पळविली होती.

शांतता प्रस्थापित होण्यासाठी पोलिसांकडून शस्त्र जप्तीची व्यापक मोहीम राबविली जात आहे. ही मोहीम ड्रोन आणि क्वाड काप्टरच्या देखरेखीखाली राबविली जात आहे. आतापर्यंत मोठ्या प्रमाणात शस्त्रे हस्तगत करण्यात आले आहेत. लुटलेले शस्त्रे परत जमा करावीत, असे आवाहन करण्यात येत आहे. सध्या राज्यात आसाम रायफल्स आणि लष्कराचे सुमारे दहा हजार जवान तैनात आहेत.

जिवंत जाळले की मॉब लिचिंग?

मणिपूरमध्ये गेल्या चोवीस तासात हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र त्यास अद्याप दुजोरा मिळू शकला नाही. इम्फाळमध्ये एका जमावाने तीन लोकांना जीवत जाळल्याचे म्हटले आहे. अन्य सूत्रानुसार त्यांना बेदम मारहाण करत ठार केल्याचेही म्हटले जात आहे. दोन वाहनांतून पीडित नागरिक लामसांग येथे जात असताना जमावाने हिंसाचार केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: भारताच्या 'या' दोन खेळाडूंमुळे India vs Pakistan सामन्याची तिकीटं विकली जात नाहीत; एमिरेट्स क्रिकेट बोर्डाचा मोठा दावा

Vasantha Ramaswamy : माजी शास्त्रज्ञ डॉ. वसंथा रामास्वामी यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर

Latest Marathi News Updates Live : नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी सशस्त्र सीमा दलाने (SSB) एक विशेष 24x7 हेल्पलाइन सुरू केली

Navratri 2025: आपण नवरात्र का साजरी करतो? हे आहे आध्यात्मिक महत्त्व आणि कारण

Mumbai Crime: आईचं मुलीच्या प्रियकरावर प्रेम जडले, एकत्र राहण्यासाठी मास्टरप्लॅन आखला, पण नंतर जे घडले त्याने सगळेच हादरले

SCROLL FOR NEXT