Political
Political esakal
देश

'2-3 मुलं जन्माला घाला, हिंदुंची लोकसंख्या कमी झाल्यासं भविष्यात मोठं संकट'

सकाळ डिजिटल टीम

आज भारत हा हिंदूंचा बहुसंख्य देश म्हणून ओळखला जातो - मिलिंद परांडे

हिंदूंनी कमीत कमी तीन मुले जन्माला घालावीतच असे वागग्रस्त वक्तव्य विश्व हिंदू परिषदेचे (vishwa hindu parishad) केंद्रीय सरचिटणीस मिलिंद परांडे (milind parande) यांनी खांडव्यात केले आहे. यावेळी ते म्हणाले प्रत्येक हिंदूच्या घरात 2 ते 3 मुले असायला हवीत. या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत हिंदूची (Hindu Population) लोकसंख्या कमी झाली तर भविष्यात मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. त्यामुळे देशातील हिंदूंनी अधिकाधिक मुले जन्माला घालायला हवीत, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. (Political News) त्यामुळे आता पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. खांडवा (MP) येथील जुन्या धान्य मार्केट जलेबी चौकात होणाऱ्या युवक संमेलनात सहभागा दरम्यान ते बोलले आहे. संमेलनादरम्यान तरुणांना त्रिशूल दीक्षाही देण्यात आली आहे.

हे तर आमच्या संघर्षाचे परिणाम

यावेळी विहिंपचे मिलिंद परांडे म्हणाले, देशातील (Indian traditional) संस्कृतीवर दोन हजार वर्षांपासून सातत्याने आक्रमणे होत आहेत. त्यानंतरही आज भारत हा हिंदूंचा बहुसंख्य देश म्हणून ओळखला जातो. हे सर्व आपले आध्यात्मिक सामर्थ्य, सहिष्णुता आणि आपल्या पूर्वजांच्या कठोर संघर्षाचे परिणाम आहेत. ज्यांच्यामुळे हा इतिहास घडला आहे. जो इतिहास वाचून सतत आपल्याला पूर्वजांची गुलामगिरी जाणवत राहते, त्यांनी केलेला संघर्षाची आठवण होत राहते.

पुढे ते म्हणाले, आपल्याला पुन्हा देशाची सत्ता मिळावी, आणि आपण राज्य करावे असे देशातील एका विशिष्ट वर्गाचे स्वप्न आहे. सातत्याने ते यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांचा हा हेतू आजपर्यंत पूर्ण झालेला नाही आणि भविष्यातही आम्ही तो होऊ देणार नाही. बजरंग दलाचा (Bajrang dal) प्रत्येक कार्यकर्ता आपल्या राष्ट्रासाठी (Desh news) आणि धार्मिक मूल्यांसाठी खंबीरपणे उभा असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT