cpim  file photo
देश

एका चुकीमुळे बंगालमध्ये डावे शिखरावरुन शून्यावर आले?

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली- दशकापूर्वी घेतलेल्या एका चुकीच्या निर्णयाचा तोटा पश्चिम बंगालमधील (west bengal) माकपला (CPI-M) आज बसत आहे. कधीकाळी सत्तेच्या शिखरावर असणाऱ्या माकपला आज राज्यात भोपळाही फोडता आलेला नाही. ममता बॅनर्जी यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाशी शपथ घेतली आहे. विशेष म्हणजे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच अशी परिस्थिती आहे, की डाव्या पक्षाला विधानसभेत कोणतेही प्रतिनिधित्व नाही. डाव्या पक्षामधील अनेक नेते मान्य करतात की, सिंगूर भूमि अधिग्रहणाचा निर्णय, त्यांच्या राजकीय पतनाचा कारण बनला. त्यानंतर पक्षाला पुन्हा उभे राहण्याची संधी मिळाली नाही. (west bengal election result 2021 left CPIM won zero seats)

माकपने २००६ मध्ये राज्यात १७६ जागा जिंकल्या होत्या आणि बुद्धदेव भट्टाचार्य मुख्यमंत्री बनले होते. पण, त्यांच्या कार्यकाळात सिंगूरमध्ये टाटा मोटर्सला शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहन करु देण्याच्या निर्णयाने तृणमूल काँग्रेसने राज्यात आपला पाया मजूबत केला. हे प्रकरण तृणमूल काँग्रेसने लावून धरले. परिणाम असा झाला की, २०११ मध्ये माकपच्या ३४ वर्षांच्या शासनकाळाचा अंत झाला. तरीही माकपला ३० टक्के मतं आणि ४० जागा मिळाल्या होत्या. २०१६ मध्ये मतांच्या टक्केवारीत आणखी घट झाली, माकपला १९.७५ टक्के मतं आणि २६ जागा मिळाल्या. त्यावेळी माकपने काँग्रेससोबत आघाडी करुन निवडणूक लढवली होती.

२०२१ च्या निवडणुकीत माकपने काँग्रेससोबत आघाडी केली होती. ममता विरोधी कट्टर मुस्लीम संघटना आयएसएफसोबत हात मिळवला, त्यामुळे डाव्यांवर टीका झाली. माकपच्या या प्रयत्नानंतरही हाती काही लागलं नाही. माकपला राज्यात एकही जागा जिंकता आली नाही आणि मतांची टक्केवारी घटून ४.७ टक्के झाली आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि आयएसएफलाही एकही जागा जिंकता आली नाही. काँग्रेसला तीन टक्के, तर आयएसएफला एक टक्के जागा मिळाल्या.

माकपकडून काय चुका झाल्या?

माकप सत्तेतून जाण्यामागे सिंगूर प्रकरण प्रमुख असले तरी, त्यानंतर पक्ष पुन्हा न उभा राहण्यामागे अनेक कारणे आहेत. ज्या मुद्द्यावरुन माकप राजकारण करत होती, तेच मुद्दे आता ममता बॅनर्जी यांनी आत्मसात केले आहेत. ममता राज्यात एक मजबूत मुख्यमंत्री म्हणून समोर आल्या आहेत, तर माकपला कोणताही चेहरा देता आलेला नाही. ३४ वर्षाच्या शासन काळात माकप ज्या विरोधी पक्षासोबत लढत होती, त्याच काँग्रेससोबत हातमिळवणी केली. भाजपने राज्यात जेव्हा जोर लावण्यास सुरुवात केली, तेव्हा माकप संभ्रमात होती की, त्यांना भाजपविरोधात लढायचंय की तृणमूलविरोधात. यासर्व कारणांमुळे माकपवर आज राज्यात शुन्यावर येण्याची वेळ आलीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, CSK vs GT: चेन्नईने दिली यष्टीरक्षक फलंदाजाला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी; गुजरातनेही केला संघात बदल

Ayodhya Train Tour: फक्त १६,७०० रुपयांत '६ धाम' यात्रा! IRCTCचा अयोध्येपासून पुरीपर्यंतचा धमाका; पाहा काय आहे खास पॅकेज!

Malaria Risk in Summer: पावसाळ्यातच नाही, उन्हाळ्यातही वाढतोय मलेरियाचा धोका; डॉक्टरांनी सांगितली महत्त्वाची कारणं

Latest Marathi News Live Update: पिक विम्यावरून शेतकऱ्यांचा संताप! 29 एप्रिलला आमरण उपोषणाचा इशारा

Horoscope : उद्या 27 एप्रिलला बनतोय धनतारिणी योग! 'या' 3 राशीच्या लोकांवरचे मोठे संकट टळणार; नव्या महिन्यात घरी येईल बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT