MJ-Akbar 
देश

महात्मा गांधींना १५ ऑगस्टला का जायचे होते पाकमध्ये

पीटीआय

नवी दिल्ली - महात्मा गांधी यांना १५ ऑगस्ट १९४७ हा दिवस नव्याने निर्माण झालेल्या पाकिस्तानात व्यतीत करायचा होता, असा दावा माजी केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांनी त्यांच्या नव्या पुस्तकात केला आहे. अर्थात, पाकिस्तानच्या निर्मितीला पाठिंबा म्हणून त्यांना असे करायचे नव्हते, असे स्पष्टीकरणही पुस्तकात देण्यात आले आहे.

एम. जे. अकबर यांनी ‘गांधीज्‌ हिंदुइझम : द स्ट्रगल अगेन्स्ट जिनाज्‌ इस्लाम’ हे पुस्तक लिहिले आहे. ‘महात्मा गांधीजींना स्वातंत्र्याच्या पहिल्या दिवशी पाकिस्तानात जायचे होते. त्यांना पाकिस्तानला पाठिंबा म्हणून नव्हे, तर फाळणीला विरोध म्हणून तिकडे जायचे होते,’ असे अकबर यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटले आहे. अकबर यांनी त्यांच्या पुस्तकात गांधीजी आणि जिना या व्यक्तिमत्त्वांचा, त्यांच्या निर्णयांचा, १९४० ते १९४७ या सात वर्षांच्या काळातील त्यांच्या राजकीय खेळ्या, यांची चर्चा केली आहे.

गांधीजींचा धर्माच्या साह्याने भारतात विविध समाजांमध्ये शांतता निर्माण करता येईल आणि भारतात सर्व धर्म गुण्यागोविंदाने राहतील, यावर विश्‍वास होता. तर, महंमद अली जिना हे श्रद्धेपेक्षा धर्माच्या राजकीय वापरावर अधिक भर देणारे होते. मुस्लिमांसाठी स्वतंत्र देश निर्माण करण्यासाठी ते इरेला पेटलेले होते. त्यामुळेच नंतर जातीय हिंसाचार उसळल्यावर गांधीजी व्यथित झाले होते. ‘माझा देशाच्या फाळणीवर विश्‍वास नाही. विरोध म्हणून त्यांनी मला मारून टाकले तरी मी हसतमुखाने मृत्यूला सामोरे जाईन. म्हणूनच, पाकिस्तानची निर्मिती झाली तर मला तिकडे जाण्याची, राहण्याची, फिरण्याची आणि ते मला काय करतात, हे पाहण्याची इच्छा आहे,’ असे गांधीजी ३१ मे १९४७ ला खान अब्दुल गफार खान यांना म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO News: नोकरी बदलणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी EPFO चा महत्त्वपूर्ण निर्णय; कुटुंबियांनाही फायदा होणार, नवीन नियम काय?

PM Modi: ओमानमध्ये मोदींचं स्वागत बघून मुस्लिम जग हादरलं! पाकिस्तानी एक्सपर्टचा संताप, ''भारताकडे एवढं लक्ष...''

Mumbai News: मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास होणार, ५१ टक्के भाडेकरूंची संमती पुरेशी; उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

Kolhapur Election : वीस प्रभागांतून तब्बल ३२९ इच्छुक; काँग्रेससमोर उमेदवार निवडीचे मोठे आव्हान

Viral Video : 'हा' व्हिडिओ पाहून चीड येईल! भररस्त्यात जावयाचे सासूसमोर लोटांगण, तरीही पत्नी मिळालीच नाही, नेमका काय प्रकार?

SCROLL FOR NEXT