farm law farmers association supreme court 
देश

समिती नको, कायदे मागे घ्या; SC च्या निर्णयावर शेतकरी नेत्यांची भूमिका

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने तीन वादग्रस्त कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे, यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी तोडगा करण्याासठी चार जणांची समिती स्थापन केली आहे. दरम्यान शेतकरी नेत्यांनी सरकार कायदा मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन बंद करणार नाही. तसंच आंदोनल दुसरीकडे कुठे केलं जाणार नाही असंही त्यांनी सांगितलं.

शेतकरी नेते राकेश टिकैत यांचे म्हणणे आहे की, आम्ही कोणतीही समिती मागितली नव्हती. आम्ही कायदा मागे घेण्याची मागणी केली आहे. सरकारने कायदा मागे घेतल्यानंतरच आम्ही घरी जाऊ. जितेंद्र मान सिंह कोण आहेत माहिती नाही. ते आमच्या संघटनेचे नाहीत आणि आम्ही त्यांना ओळखत नाही. आम्ही पुन्हा बैठक घेऊ, कायदे मागे घेण्याशिवाय दुसरी काहीच मागणी नाही असंही ठणकावून सांगितलं.

सरन्यायाधीश एस ए बोबडे, न्यायाधीस ए एश बोपन्ना आणि न्यायाधीश वी रामासुब्रमण्यम यांच्या पीठाने मंगळवारी वेगवेगळ्या पक्षांची बाजू ऐकल्यानंतर असे आदेश दिले की कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती द्यावी. त्यासोबत एका समितीची स्थापना करण्याची घोषणासुद्धा केली. या समितीमध्ये भारतीय शेतकरी संघटनेचे भूपिंदर सिहं मान, शेतकरी संघटनेचे अनिल घनवंत, डॉक्टर प्रमोद जोशी आणि कृषी अर्थतज्ज्ञ अशोक गुलाटी यांचा समावेश आहे.

व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने सांगितलं की, कोणतीही शक्ती अशा प्रकारची समिती स्थापन करण्यापासून रोखू शकत नाही. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी समितीला सहकार्य करावं अशी विनंतीसुद्धा करण्यात आली. न्यायालयाकडून स्थापन करण्यात आलेल्या समितीला सहकार्य करण्याबाबत नकारात्मक असलेल्या शेतकऱ्यांनाही सर्वोच्च न्यायालयाने सुनावलं. खरंच ज्यांना यावर तोडगा काढायचा आहे ते समितीला सहकार्य करतील असंही न्यायालयाने म्हटलं. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

FDA Crime : ‘क्रीमी डिलाइट’, महावीर डेअरीवर एफडीएची कारवाई; लाखो रुपयांचे पदार्थ आढळले असुरक्षित

SCROLL FOR NEXT