Career Break
Career Break esakal
एज्युकेशन जॉब्स

Career Break : कामातून ब्रेक घेणं करिअरसाठी ठरतय फायदेशीर; कसं ते वाचा...

सकाळ डिजिटल टीम

Career Break : आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आव्हानं असतात, शाळा झाली की कॉलेज आणि चांगले करियर बनवण्यासाठीची धडपड. त्यात आपली स्वतःची एक बकेट लिस्ट असतेच, घर घेयच आहे, गाडी घेयची आहे, बाहेर फिरायला जायच आहे, इकॉनॉमिकली स्टेबल व्हायच आहे.

त्यात घरच्यांच्याही आपल्याकडून खूप अपेक्षा असतात. हे सगळं करत असतांना प्रत्येकावेळी मनासारख्या गोष्टी होतातच असं नाही. मग त्याच वाढत्या वयासोबत येणारं डिप्रेशन, एकंदरीत मानसिक दृष्ट्या आपण खूप काही फेस करत असतो.

काही लोक सतत चिंता करून ते साध्य करण्याचा प्रयत्न करू लागतात आणि यात ब्रेक घेणे खूप गरजेच आहे हे विसारतात. पण काही लोक करिअरमध्ये ब्रेक घेयला घाबरतात, कारण त्यांना असे वाटते की याने ते वेळ वाया घालवता आहेत.

आयुष्याच्या चिंता मरेपर्यंत सोबत असणारच आहेत. त्यांना हळूहळू सोडवण यात काही वाईट नाही पण यात स्वतःच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देण खूप गरजेच आहे. करिअरमध्ये ब्रेक घेणे म्हणजे वेळ वाया घालवण नाही, तर फूल एनर्जीने परत एकदा काम सुरू करण असा असतो.

करिअर ब्रेक म्हणजे काय?

तुम्ही बर्‍याच लोकांना sabbatical शब्द वापरताना ऐकलं असेल, ज्याचा अर्थ 'कामातून ब्रेक घेणे' आहे. करिअर ब्रेक ही देखील अशीच एक वेळ असते, जेव्हा तुम्ही तुमच्या रुटीनमधून काही वेळासाठी ब्रेक घेतात कुठेतरी फिरायला जातात किंवा आपल्या आवडणाऱ्या गोष्टी करतात तेव्हा तुम्ही मेंटली खूप स्ट्रॉंग होतात.

करिअरचा ब्रेक तुम्हाला हवा तसा मोठा किंवा छोटा असू शकतो. करिअरमध्ये ब्रेक का घ्यावा?

1. कधी कधी करिअर ब्रेक घेतल्याने आपले मन पूर्वीपेक्षा शांत होते. आपण आपले निर्णय किंवा पुढच्या स्टेप्स उचलतांना जास्त चांगल्या पद्धतीने विचार करू शकतो. जेव्हा आपण कोणतीही काळजी न करता स्वतःसोबत वेळ घालवतो तेव्हा आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळतात. आपण अनेक गोष्टींचा सखोल विचार करतो, ज्यामुळे आपल्याला निर्णय घेणे सोप होतं.

2. करिअरमध्ये ब्रेक घेतल्यानंतर प्रवासादरम्यान अशा अनेक आठवणी तयार होतात जे अचानक चेहऱ्यावर हसू आणतात. आपण आपल्या मित्रांबरोबर बसून जून प्रसंग आठवतो आणि फार मजा येते, एकंदरीत त्याने आपण आपल्या चिंता विसरतो.

3. करिअरमध्ये ब्रेक घेतात तेव्हा खिसा पैशाने नाही तर खूप वेगवेगळ्या अनुभवांनी आणि मनोरंजक आठवणींनी भरून जातो. आणि बहुदा कोणतंही काम तुम्हाला तो देऊ शकत नाही.

4. जर तुम्ही सोलो ट्रिपला जात असाल तर मग त्यात खूप मजा येते, अनुभव येतात आपली पर्सनॅलिटी सुधारते आणि नवीन लोकांशी ओळख होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : आघाडीत आतापासूनच ‘तुपा’वरून भांडणे; पंतप्रधान मोदींची टीका

Loksabha Election 2024 : या आहेत सहाव्या टप्प्यातील प्रमुख लढती

Drinking Water : पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; मुख्यमंत्र्यांनी घेतला टंचाईचा आढावा

Sambit Patra : संबित पात्रांच्या विधानाचे पडसाद मतपेटीवर?

Kalyaninagar Accident : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणाच्या तपासासाठी दहा पथके नियुक्त

SCROLL FOR NEXT