Students 
एज्युकेशन जॉब्स

CBSE Board : वर्षातून दोन वेळा होणार दहावी-बारावी परीक्षा

नामदेव कुंभार

CBSE Class 10, 12 Board Exams 2022 : कोरोना महामारीचा धोका लक्षात घेऊन सीबीएसईने 2021-22 या नवीन सत्रामध्ये मोठा बदल केला आहे. शैक्षणिक दृष्ट्या अतिमहत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांसंदर्भात सीबीएसईने सोमवारी मोठा निर्णय घेतला आहे. 2021-22 या सत्रापासून वर्षातून आता दोन वेळा परिक्षा होणार आहेत. याचा आराखडा सीबीएसईने तयार केला आहे. यासंबंधीचं परिपत्रक बोर्डाने जारी केलं आहे. यात परीक्षा कशा पद्धतीने होईल, सिलॅबस काय असेल, अंतर्गत मूल्यमापनाचे धोरण काय असेल याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

सीबीएसईने दिलेल्या माहितीनुसार, 2021-22 हे शैक्षणिक वर्ष दोन टर्ममध्ये विभाजित करण्यात आलं आहे. प्रत्येक टर्ममध्ये 50-50 टक्के अभ्यासक्रम पुर्ण होईल आणि त्यानंतर परिक्षा घेतल्या जातील. पहिल्या सत्राची परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तर दुसऱ्या सत्राची परीक्षा मार्च-एप्रिलमध्ये घेण्यात येईल, असं सीबीएसईकडून सांगण्यात आलं आहे.

कोरोना संकटात शाळा व कॉलेजेस ऑनलाइन पद्धतीने सुरू आहेत. महारामारी दीड वर्षांपासून तळ ठोकून असून कमी होण्याचं नाव घेत नाहीये, त्यामुळे आता परीक्षा घेण्याची शक्यता कायम राहावी यासाठी वर्षातून दोन वेळा परीक्षा घेण्याचा निर्णय केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे. परीक्षा जरी वर्षातून दोनवेळा होणार असल्या तरी अभ्यासक्रम तोच राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Social Media Election Rules : निवडणूक प्रचारात डीपफेक व्हिडिओ वापराल तर कारवाई; आयोगाचे राजकीय पक्षांना कडक निर्देश

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Chanakya Niti: नशीब बदलत नाही म्हणून निराश आहात? चाणक्य नीतीतील ‘या’ २ सवयी आजपासून अंगीकारा!

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

Marathi News Live Updates : एनडीए "१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत देशभरात 'सेवा संकल्प' अभियान' राबवणार : अमित शहा

SCROLL FOR NEXT