आयटीआयची गुणवत्तायादी मंगळवारी sakal media
एज्युकेशन जॉब्स

ITI : आयटीआयची गुणवत्तायादी मंगळवारी

खासगी व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील (आयटीआय) शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत ऑगस्टच्या सत्रातील प्रवेश सुरू झाले आहे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : खासगी व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील (आयटीआय) शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत ऑगस्टच्या सत्रातील प्रवेश सुरू झाले आहे. तिसऱ्या पाळीतील गुणवत्ता यादी मंगळवारी (ता.१६) घोषित करण्यात येणार आहे. नवी दिल्लीतील प्रशिक्षण महासंचालनालयाने परवानगी दिल्यानंतर हे प्रवेश सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

आयटीआयच्या तिसऱ्या पाळीतील प्रवेशासाठी ३० नोव्हेंबर पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे विहित वेळेत अर्ज सादर करू न शकलेल्या विद्यार्थ्यांना समुपदेशन फेरीत संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील प्रवेश केंद्रीय पद्धतीने होत आहे. उपलब्ध जागांवर आणि संस्थास्तरीय जागांसाठीही ऑनलाइन अर्ज सादर करावे लागणार आहे.

ऑनलाइन प्रवेश प्रणाली व्यतिरिक्त प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश ग्राह्य धरले जाणार नाही. अधिक माहितीसाठी https://admission.dvet.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Smriti Mandhana Record: स्मृती मानधनाचा रेकॉर्ड; विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यानंतर T20I मध्ये पराक्रम करणारी तिसरी भारतीय

Stock Market Today : भारतीय शेअर बाजारात तेजी! सेन्सेक्स 500 अंकांनी वाढला; परदेशी गुंतवणूकदारांची वापसी; सोन्याच्या भावाचा प्रभाव

Kashmir Saffron Crisis: साळिंदरांचा केशर उत्पादनाला फटका; काश्‍मीरमध्ये शेतकऱ्यांपुढे हवामान बदलासह आणखी संकट

BJP Minister Statement : ''राजकीय गरज म्हणून जाहीर केल्या अनेक योजना; आता पूर्ण करणं कठीण'', भाजप मंत्र्याची कबुली; राजकीय वर्तुळात खळबळ!

Satej Patil : 'दोरी तुटली, आता बांध ही स्वतंत्र झाले'; हसन मुश्रीफ यांच्या 'त्या' वक्तव्यावर काय म्हणाले सतेज पाटील?

SCROLL FOR NEXT