Job Switch  google
एज्युकेशन जॉब्स

Job Switch : या महिन्यांत चुकूनही घेऊ नका नोकरी बदलण्याचा निर्णय; योग्य वेळ कोणती ?

काही जणांना दुसरी नोकरी शोधायला सुरुवात केल्यानंतर लगेच नोकरी मिळते; तर काही जणांना मात्र दिवसेंदिवस वाट बघूनही नोकरी मिळत नाही.

नमिता धुरी

मुंबई : प्रत्येक कंपनीमध्ये असे काही कर्मचारी असतात जे वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी चिकटून बसतात. ते कंपनीला आणि कंपनी त्यांना कधीच सोडत नाही. असे काही लाडके कर्मचारी सोडले तर बरेच तरूण कर्मचारी असे असतात ज्यांना दर काही वर्षांनी एक कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीत रुजू होणे आवश्यक वाटते.

काही जणांना दुसरी नोकरी शोधायला सुरुवात केल्यानंतर लगेच नोकरी मिळते; तर काही जणांना मात्र दिवसेंदिवस वाट बघूनही नोकरी मिळत नाही. हे असं होण्यामागे नेमके काय सिक्रेट्स आहेत जे कोणताच एचआर कधीच तुम्हाला सांगत नाही... पाहू या.

नोकरी बदलण्याची एक ठरावीक वेळ असते. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यांमध्ये बहुतांश कंपन्या त्यांचं वार्षिक आर्थिक नियोजन करतात. त्यामुळे किती कर्मचाऱ्यांची भरती करायची हे याच काळात ठरतं आणि भरपूर रिक्त जागा (job vacancies) खुल्या होतात. मुलाखत सत्र सुरू होते व कर्मचाऱ्यांना ऑफर लेटर्स दिले जातात.

या काळात ऑफर लेटर्स मिळालेले कर्मचारी एप्रिल, मे, जून या काळात आधीची नोकरी सोडतात आणि दुसऱ्या ठिकाणी रुजू होतात. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या काळात नोकरी सोडणे धोक्याचे असते; कारण या काळात मर्यादित व्हॅकेन्सीज असतात.

नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यात तुम्ही दुसऱ्या नोकरीसाठी तयारी करू शकता. बाजारात नव्याने आलेले तंत्रज्ञान, कौशल्य शिकून घेण्याला प्राधान्य द्या.

या सर्व नियमांचा विचार करून तुम्ही जॉब स्वीच करणार असाल तर तुमच्यासाठी नोकरी बदलण्याचा प्रवास थोडा कमी त्रासदायक होईल. अन्यथा अनेकदा नोकरीच्या शोधात कर्मचारी जेरीस येतात आणि मानसिक आरोग्य बिघडते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! राज्यातील ३००० शाळांमधील शिक्षकांचा थांबणार पगार; ‘हे’ आहे मुख्य कारण; नववी-दहावीच्या वर्गांसाठी २० पट बंधनकारक, अन्यथा...

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 फेब्रुवारी 2026

Satara Accident: कंटेनरच्या धडकेत महिला जागीच ठार; टोपजवळील अपघातात पती गंभीर जखमी, कऱ्हाड तालुक्यातून हळहळ व्यक्त!

Income Tax : ‘रिफंड’ मिळण्यास विलंब कशामुळे?

अग्रलेख : शेजारी ‘सख्खे’ होतील?

SCROLL FOR NEXT