Ganeshotsav 2022 esakal
Ganesh Chaturthi Festival

Ganeshotsav 2022 : ...यामुळे पडले गणेशाला सिंदुरवदन हे नाव, जाणून घ्या कहाणी

सकाळ डिजिटल टीम

आपल्या लाडक्या बाप्पाची अनेक नावे आहेत. आणि यापैकीच एक म्हणजे 'सिंदुरवदन'. हे नाव गणेशाला पडले याची एक रंजक कहाणी आहे. गणेशपुराणात उल्लेख असलेली ही कथा आता आपण जाणून घेवूया.

ब्रह्मदेव त्यांच्या निवासस्थानी निद्रा करीत असताना कैलासपर्वतावरुन शिव शंकर त्यांना भेटायला आले. मात्र ब्रह्मदेव निद्रावस्थेत होते. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर शंकरांनी ब्रह्मदेवांना झोपेतून जाग केलं. झोपेतून जाग येताच ब्रह्मदेवांना जांभई आली. या जांभईतून एक बालक जन्मला. तोवर शंकर तेथून निघून गेले होते.

तो बालक नजरेस पडताच ब्रह्मदेवाने तू कोण असे त्याला विचारले. तेव्हा तो बालक म्हणाला, मी आपल्याच जांभईतून उत्पन्न झालेला आपलाच पुत्र आहे. आता मी कसे जगावे याची मला आज्ञा करावी. तेव्हा ब्रह्मदेव त्याला म्हणाले, पुत्रा मी तुला वर देतो की तू त्रैलोक्यामध्ये मुक्त संचार कर, तुला कोणापासूनही मृत्यू, तू ज्याला अलिंगन देशील त्याचा तात्काळ मृत्यू होईल. तुझ्या शरीराचा रंग तांबडा असल्याने लोक तुला 'सिंदुर' नावाने ओळखतील.

हे ऐकताच हा सिंदुर थेट ब्रह्मदेवालाच अलिंगन देण्यासाठी जवळ येवू लागला. हे पाहून ब्रह्मदेव क्रोधीत झाले आणि म्हणाले, उन्मत्ता तू तर तुझ्या पित्याचाच काळ बनू पाहतो आहे. तुझ्या या कृत्याने तू दैत्य होशील. असे सांगत ब्रह्मदेव वैकुंठात निघून गेले. त्यांच्यामागोमाग हा दैत्यही वैकुंठात पोहोचला. तेव्हा विष्णूने तू कैलास पर्वतावर महादेव शंकराशी युद्ध कर असे सांगितले.

सिंदूर कैलासावर पोहोचला. तेव्हा पार्वतीला घेवून पळून जात असताना गजानाने त्याच्यावर परशूने वार केला. तो दैत्य त्या आघाताने तेथून पृथ्वीवर निघून गेला. व तेथून देवांना त्रास देवू लागला. सगळीकडे या दैत्याने अधर्म माजविला होता. तेव्हा सर्व देवांनी गणेशाचा धावा केला. तेव्हा गणेशाने मी लवकरच सिंदुरासुराचा वध करेन असे देवतांना सांगितले.

शंकर पार्वतीकडे गजमुखात गजाननाचा जन्म झाला. जन्मताच या बालकाने मला वरेण्या राजकडे पोहोचवा असे सांगितले. हे ऐकताच शंकरांनी नंदीसह या पुत्राला वरेण्या राजाकडे पोहचवले. वरेण्या राजाची राणी निद्रावस्थेत असताना हे बालक तिच्या शेजारी ठेवण्यात आले. चार हात, आणि मुखावर सोंड असलेले हे बालक वरेण्याची पत्नी पुष्पिका हिने पाहिले. ते पाहताच ती भीतीने जोरात किंचाळली. राजानेही घाबरुन ते बाळ जंगलात नेऊन ठेवले. तेव्हा मोराने अन् भुजंगाने या बाळाचे रक्षण केले. जवळच पाराशर ऋषींचा आश्रम होता. पाराशर ऋषींना संतती नव्हती त्यामुळे ही ईश्वराचीच देण आहे असे मानून त्या बालकाचे संगोपन केले. पाराशर ऋषींनी या बाल गजाननाला शस्त्रास्तर अस्त्र पारंगत केले. इकडे सिंदूरासुराला आकाशवाणी ऐकू आली ज्यात, हे सिंदुरासुरा तुझे प्राण घेणारा आला आहे. हे ऐकुन सिंदुरासुराने कैलासावर धाव घेतली.

पार्वतीला मारण्यासाठी सिंदुरासुराने शस्त्र उगारताच त्याला बाल गजानन दिसला. सिंदुरासुराने त्याला पकडून आकाशात उड्डाण केले. सिंदुरासुराने आकाशात उड्डाण केले तेव्हा या बालकाचे वजन इतके वाढले कि सिंदुरासुराला त्याचे वजन पेलवेनासे झाले. सिंदुरासुराने त्याला खाली फेकून दिले. हा बाल गजानन नर्मदेत पडला. नर्मदेतील गोटे लाल झाले. बालक मेला असे समजत सिंदुरासुराला आनंद झाला मात्र काही क्षणात त्याला त्या प्रत्येक गोट्यात त्याला गजाननाची मुर्ती दिसू लागली. गजानन उंदरावर बसून सिंदुरासुराच्या राजधानीकडे गेले. हाती आयुधे आणि उंदरावर बसून आलेला क्रोधीत बालक पाहून सिंदुरासुराला वाटले आपण याला मिठीत घेवून यमसदनी पाठवू. मात्र तेव्हढ्यात गजाननाने विराट रुप धारण केले.

अनंत मस्तके, अनेक हात आणि पाय असलेले हे विराट रुपात सिंदुरासुरालाच मिठी मारली आणि सिंदुरासुराचा चेंदामेंदा केला. त्यावेळी गजाननाला सिंदुरासुराच्या अंगाचे रक्त लागल्याने गजाननाचे अंग तांबडे झाले. तेव्हापासून गजाननाला 'सिंदुरवदन' म्हटले जाऊ लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayakwadi Dam : जायकवाडी धरणाचे आपत्कालीन दरवाजे उघडले, १ लाख १५ हजार क्युसेकने विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Viral: पहिल्यांदा चावला तर १० दिवस तुरुंग; पुन्हा चावला तर आजीवन कारावास, भटक्या कुत्र्यांसाठी प्रशासनाचा अनोखा नियम

BMWने उडवलं, केंद्रीय अर्थ मंत्रालयातील उपसचिवाचा मृत्यू, पत्नी गंभीर; महिलेला अटक

IND vs PAK : टीम इंडियाचं वाकडं करू शकत नाही, म्हणून पाकिस्तानची ICC कडे तक्रार; तिथे कोण बसलाय हे ते बहुधा विसरलेत...

Pune Water Crisis : नळाच्या पाण्यात आढळल्या चक्क अळ्या; वैदूवाडी, आशानगरमध्ये महिलांकडून थाळ्या वाजवून संताप व्यक्त

SCROLL FOR NEXT