kabul airport
kabul airport esakal
ग्लोबल

काबूलमध्ये पाण्याची बाटली 3 हजाराला, तर राइस प्लेट 7500 रुपयात

बाळकृष्ण मधाळे

काबूल (अफगाणिस्तान) : तालिबान्यांनी (Taliban) अफगाणिस्तान (Afghanistan) ताब्यात घेतल्यापासून या देशात सर्व काही बदललं आहे. जास्तीत-जास्त लोक या देशातून कसं बाहेर पडता येईल, हाच विचार करत आहेत. अफगाणिस्तानातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग शिल्लक राहिलाय, ते म्हणजे 'काबूल विमानतळ'. (Kabul Airport) येथील सुरक्षा अमेरिकन सैनिकांकडे आहे. सध्या या विमानतळावर सुमारे अडीच लाख लोकांची गर्दी असून यातील प्रत्येकजण आपला जीव वाचवण्यासाठी अफगाणिस्तान सोडण्याच्या तयारीत आहे. अशा परिस्थितीत भुकेले आणि तहानलेले लोक विमानतळावर आपला जीव सोडताना दिसत आहेत.

तालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यापासून या देशात सर्व काही बदललं आहे.

दरम्यान, विमानतळावर अन्न आणि पाण्याचे भावही आता गगनाला भिडत असल्याची मोठी बातमी समोर आलीय. येथे पाण्याची बाटली 40 डॉलर म्हणजे, 3000 रुपयांना उपलब्ध आहे. तर, भाताच्या प्लेटसाठी 100 डॉलर म्हणजेच, 7500 रुपये खर्च करावे लागत आहेत. विमानतळावर पाणी किंवा अन्न खरेदी करायचं म्हटलं तर येथे अफगाण चलन घेतलं जात नाही. त्यामुळे फक्त डॉलर स्वीकारले जाताहेत.

तालिबान्यांच्या गोळीबारामुळे 'दहशत'

अफगाणिस्तानमधील लोकांचं म्हणणं आहे, की त्यांना काबूलमधील घरातून विमानतळावर पोहोचण्यास 5 ते 6 दिवस लागले. कारण, तालिबान्यांचा शहरापासून विमानतळापर्यंत पहारा आहे. तालिबान्यांच्या गोळीबारामुळे दहशत निर्माण झाली असून हजारोंचा जमाव ओलांडून विमानतळावर प्रवेश मिळवणे एक कठीण काम आहे. तुम्ही विमानतळाच्या आत गेलात तरी विमान येण्यास पाच ते सहा दिवस लागतात. त्यामुळे फक्त बिस्किटवर अवलंबून राहावं लागत असल्याचं त्यांनी सांगितलं. खाण्या-पिण्याच्या किंमती जास्त असल्याने त्यांच्या समस्याही वाढल्या आहेत. अफगाणिस्तानची स्थिती अशी आहे, की अनेक मुलं त्यांच्या पालकांशिवाय अफगाणिस्तान सोडत आहेत.

गोंधळात 20 जणांचा मृत्यू

अन्न आणि पाण्याच्या किमतीत वाढ झाल्यामुळे लोकांना उपाशी पोटी उन्हात उभं राहावं लागत असून शरीर अशक्त झालं आहे, ते लोक बेशुद्ध पडताना दिसत आहेत. अशा स्थितीत, लोकांना मदत करण्याऐवजी तालिबान त्यांना घाबरवत आहे, मारत आहे. काबूल विमानतळाबाहेर झालेल्या गोंधळात आत्तापर्यंत 20 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

काबूलमधून 82,300 लोकांना काढलं बाहेर

काबूलमधून आत्तापर्यंत 82,300 लोकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश आलं आहे. काबुलमध्ये जवळ-जवळ 6 हजार अमेरिकन सापडले, त्यापैकी 4500 लोकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं. मात्र, यावर तालिबानने आपली प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे, की जर अमेरिकेनं 31 ऑगस्टपर्यंत आपली मोहीम संपवली नाही, तर त्याचे परिणाम भयंकर असू शकतात, असा इशारा त्यांनी दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: ईडीच्या कारवाईबाबत केजरीवालांचं पुढे काय होणार? सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला निकाल

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीत भाजप किती जागा जिंकेल? प्रशांत किशोर, योगेंद्र यादव यांनी दिलं उत्तर

परराष्ट्र मंत्रालयाकडून लाओस, कम्बोडियाला जाणाऱ्या भारतीयांसाठी अ‍ॅडव्हायझरी जारी; काय आहे कारण?

Forbes 30 Under 30: फोर्ब्सने '30 अंडर 30 एशिया' यादी केली जाहीर; 'या' भारतीयांनी मिळवले स्थान

Latest Marathi News Live Update : रायबरेलीतील सभेत बोलताना सोनिया गांधी भावुक

SCROLL FOR NEXT