jaggi vasudev Team eSakal
ग्लोबल

Sadhguru Jaggi Vasudev वसुंधरेसाठी करणार लंडन ते भारत बाईक राईड

२१ मार्चला लंडनपासून या यात्रेची सुरूवात होणार आहे

सकाळ डिजिटल टीम

इशा फाऊंडेशनचे संस्थापक आणि आध्यात्मिक गुरू जग्गी वासुदेव पृथ्वी (Earth) वाचविण्यासाठी महत्वाची यात्रा करणार आहेत. ते लंडन ते भारत अशी ३० हजार किलोमीटरची बाईक (Bike) यात्रा करणार आहेत, सद्गुरू सेव्ह सॉईल आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. ही यात्रा १०० दिवस चालणार असून लंडन ते भारत दरम्यान ते ३२ देशांना भेट देणार आहेत. त्याची सुरूवात २१ मार्चला लंडनपासून होणार आहे. यात्रेदरम्यान बाईकचे सारथ्य ते स्वत: करणार आहेत.

मातीवरचे (Soil) संकट दूर करण्यासाठी हे वैश्विक आंदोलन आहे. मातीसंदर्भात काम करणाऱ्या जगभरातील लोकांना एकत्र आणण्यासाठी काम केले जाते. सर्व देशातील नेत्यांना आपल्या भागातील शेतात योग्य मातीचा वापर करून मातीचा जैविक स्त्रोत वाढविण्याची योग्य दिशा देण्याबरोबरच राष्ट्रीय निती आणि कार्य करण्यासाठी आंदोलनद्वारे पाठिंबा देण्यात येतो.

त्यामुळे निती परिवर्तनाला गती देण्यासाठी सदगुरू जग्गी वासुदेव स्वत: दुचाकी चालवत लंडन-भारत यात्रेदरम्यान ३० हजार किलोमीटर अंतराचा प्रवास करणार आहेत. यादरम्यान ते जगभरातील नेते आणि नागरिकांना भेटणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA: शुभमन गिल टीम इंडियासोबत दुसऱ्या कसोटीसाठी प्रवास करणार की नाही? अखेर BCCI नेच दिले अपडेट

Viral News : ऑफिसमध्ये मॅनेजर बनायचा हिटलर! सुट्टी-वर्क फ्रॉम होमवर विचारायचा शंभर प्रश्न; वैतागून तरुणाने केला धक्कादायक प्रकार

Latest Marathi Breaking News Live Update : आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवला शीतल तेजवानीचा जबाब

Satara Politics:'भाजपचा सातारा नगरपालिकेत महाविकास आघाडीला दणका'; आशा पंडित बिनविराेध विजयी..

Kolhapur Election: कोल्हापुरात निष्ठेला तिलांजलि, संधिसाधू राजकारणाची परंपरा जुनीच; मुश्रीफ-घाटगे युतीमुळे पुन्हा चर्चा

SCROLL FOR NEXT