India and China Sakal
ग्लोबल

चीनचे सुरक्षाविषयक आव्हान मोठे

सरसेनाध्यक्ष जनरल बिपीन रावत यांचे मत; आगळीक केल्यास चीनला सडेतोड प्रत्युत्तर

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : आपल्या देशासमोर चीनने मोठे सुरक्षाविषयक आव्हान निर्माण केले असून भारताने देखील खबरदारीचा उपाय म्हणून शेकडो तुकड्या आणि अन्य शस्त्रे मागील वर्षीच सीमावर्ती भागामध्ये हालविली आहेत. आपल्याला आणखी बराच काळ त्याठिकाणी राहावे लागेल. चीनने पुन्हा गलवानसारखी आगळीक केली तर त्यांना पूर्वीच्याच भाषेत उत्तर देण्यात येईल असे मत सरसेनाध्यक्ष जनरल बिपीन रावत यांनी मांडले आहे. एका वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये विश्वासाचा अभाव असून संशयाचे वातावरण देखील आणखी गडद झाले आहे. यामुळे सीमावादाचे देखील निराकरण होताना दिसत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मागील महिन्यामध्येच भारत आणि चीन यांच्यातील कमांडर दर्जाच्या अधिकाऱ्यांची बोलणी पार पडली होती पण त्यातून देखील तोडगा निघू शकला नाही. दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांनी माघार घेण्यास ठामपणे विरोध दर्शविला आहे. चीनने सीमावर्ती भागातील स्वतःची ताकद आणखी वाढवायला सुरूवात केली असून भारताने देखील खबरदारीचा उपाय म्हणून या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर लष्करी तुकड्या तैनात केल्या असल्याचे रावत यांनी सांगितले. अफगाणिस्तानातील ताज्या राजकीय स्थित्यंतरावर देखील रावत यांनी चिंता व्यक्त केली.

या सगळ्या बदलांचा भारताच्या सुरक्षेवर देखील परिणाम होईल असे त्यांनी सांगितले. जम्मू- काश्मीरमधील दहशतवाद्यांना अफगाणिस्तानातून पाठबळ मिळू शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. चीन आणि पाकिस्तानने निर्माण केलेल्या सुरक्षाविषयक आव्हानांमुळेच थिएटर कमांडची निर्मिती झाल्याचे ते म्हणाले.

डेटा विधेयकाला तातडीने मान्यता हवी

संसदेमध्ये २०१९ साली सादर करण्यात आलेल्या डेटा संरक्षण विधेयकालात तातडीने मान्यता मिळणे गरजेचे आहे. सध्याच्या व्हर्च्युअल जगामध्ये डेटा चोरी हा सर्वसामान्य गुन्हा बनला असल्याचे मत रावत यांनी मांडले. केरळ पोलिसांच्या वतीने आयोजित सायबर संमेलनामध्ये बोलताना त्यांनी ही बाब मांडली. भारतामध्ये वेगळा सायबर सुरक्षा कायदा नाही त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर व्हर्च्युअल सुरक्षा ही खूप महत्त्वाची गोष्ट असल्याचेही त्यांनी नमूद केले.

व्हर्च्युअल स्पेसच्या सुरक्षेसाठी आपल्याला एक वेगळा आराखडा तयार करावा लागेल. अनेक सरकारी संस्था सायबर सुरक्षेचा मुद्दा हाताळताना दिसतात. आता विविध पातळ्यांवर काम करणाऱ्या तज्ज्ञांनी अधिक संघटितपणे आणि एका दिशेने काम करणे गरजेचे असल्याचे मत रावत यांनी मांडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : घरफोडीच्या गुन्ह्यात अटक, मुद्देमाल जप्त

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT