pakistan, PCB,  t20 world cup in india, government of india, visa, icc, uae
pakistan, PCB, t20 world cup in india, government of india, visa, icc, uae 
ग्लोबल

पाकिस्तानच्या पोटात दुखलं, कोंडी करण्यासाठी लिहिलं ICC ला पत्र

सकाळ ऑनलाईन टीम

यंदाच्या वर्षी आयसीसी टी-20 वर्ल्डकपची मेजवाणी भारत करणार आहे. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारत सरकारवर अविश्वासाची भावना व्यक्त केली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एहसान मनी यांनी व्हिसासंदर्भात शंका उपस्थितीत केली असून यांसदर्भात त्यांनी थेट आयसीसीला पत्र लिहिले आहे. मार्चच्या अखेरीपर्यंत भारत सरकारने क्रिकेट चाहते आणि पाकिस्तानी पत्रकारांना व्हिसा देण्यासंदर्भात लेखी आश्वासन दिले नाही तर आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धा  अन्य देशांत  घेण्याचा विचार करावा, असे पत्र एहसान मनी यांनी आयसीसीला लिहिले आहे.    

आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळ (ICC) स्पर्धेसंदर्भातील घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. वर्षाच्या अखेरीस भारतामध्ये होणाऱ्या टी-20 स्पर्धेसंदर्भात तेढ निर्माण झाला तर UAE मध्ये स्पर्धा घेण्याचा दुसरा पर्यायही आयसीसीने खुला ठेवला आहे. या वर्षी होणाऱ्या आयसीसी टी-20 वर्ल्ड कपचे यजमानपद हे ऑस्ट्रेलियाला मिळाले होते. मात्र कोरोनाच्या संकटामुळे भारताला मेजवाणीची संधी मिळाली आहे.

भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाचा दोन्ही देशाच्या क्रिकेट संबंधावरही परिणाम झाला आहे. अनेक वर्षांपासून दोन्ही देशांतील द्विपक्षीय मालिका बंद असून आयसीसीच्या स्पर्धेतच दोन्ही संघ एकमेकांविरुद्द खेळताना दिसते. यंदाच्या वर्षी भारतात स्पर्धा नियोजित असल्यामुळे पाकिस्तानचे टेन्शन वाढले आहे. भारत सरकार पाकिस्तानी चाहते आणि पत्रकारांना व्हिसा देणार नाही, अशी भावना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांनी आयसीसीला लिहिलेल्या पत्रातून बोलून दाखवली आहे. यासंदर्भात भारत सरकारची भूमिका नेमकी काय ? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

आम्हाला डिसेंबर 2020 पर्यंत क्रिकेट चाहते आणि पत्रकार यांच्या व्हिसासंदर्भात लेखी आश्वासन मिळेल, असे आयसीसीने सांगितले होते. याचा आम्ही जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये पाठपुरावाही केला. आता आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे. मार्चच्या अखेरपर्यंत जर आम्हाला व्हिसासंदर्भात भारत सरकारने लिखित आश्वासन दिले नाही तर स्पर्धा युएईमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घ्यावा, असे एहसान मनी यांनी स्पष्ट केले आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT