sri lanka Sakal
ग्लोबल

कंगाल श्रीलंकेत पुन्हा आणीबाणी जाहीर; विक्रमसिंघेंचे आदेश

यापूर्वी 13 जुलै रोजी तत्कालीन राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या विरोधात प्रचंड गदारोळ आणि जनक्षोभामुळे श्रीलंकेत आणीबाणी लागू करण्यात आली होती.

सकाळ डिजिटल टीम

कोलंबो : भीषण आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेत (Sri Lanka) आजपासून पुन्हा एकदा आणीबाणी (Emergency ) लागू करण्यात आली आहे. देशाचे कार्यवाह अध्यक्ष रोनिल विक्रमसिंघे (Ranil Wickremesinghe) यांनी हा आदेश दिला आहे. आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था आणि जीवनावश्यक वस्तूंचा सुरळीत पुरवठा करण्यासाठी 18 जुलैपासून पुन्हा आणीबाणी लागू करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आलेल्या आदेशात नमुद करण्यात आले आहे. (Sri Lanka Latest News In Marathi)

यापूर्वी 13 जुलै रोजी तत्कालीन राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या विरोधात प्रचंड गदारोळ आणि जनक्षोभामुळे श्रीलंकेत आणीबाणी लागू करण्यात आली होती. राजपक्षे देशातून पळून गेल्यानंतर विक्रमसिंघे यांना हंगामी अध्यक्ष बनवण्यात आले. त्यांच्या निवडीनंतर देशातील आणीबाणी उठवण्यात आली होती, मात्र आता आठवडाभरातच पुन्हा एकदा आणीबाणी जाहीर करण्याची वेळ आली आहे.

गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळापासून श्रीलंकेतील परिस्थिती अनियंत्रित झाली असून, देशात जीवनावश्यक वस्तू आणि इंधनाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. यापूर्वीच्या राजपक्षे सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप करत सामान्य नागरिकांनी अनेकदा रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणात आंदोलन केले आहे. याशिवाय गेल्या आठवड्यात संतप्त आंदोलकांनी राजधानी कोलंबे येथील राष्ट्रपती भवनावर ताबा मिळवला होता. यानंतर तत्कालीन राष्ट्रपती गोटाबाया यांनी देश सोडला. देश सोडल्यानंतर गोटाबाया राजपक्षे आधी मालदीवला गेले त्यानंतर तेथून त्यांनी सिंगापूर गाठले.

आणीबाणीचा दीर्घ इतिहास

श्रीलंकेत आणीबाणीचा मोठा इतिहास आहे. 1948 मध्ये इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि त्याआधीही अनेकवेळा देशाने आणीबाणी अनुभवली आहे. 1958 मध्ये स्वातंत्र्यानंतर सिंहली ही एकमेव भाषा म्हणून स्वीकारल्याच्या निषेधार्थ परिस्थिती बिघडल्यानंतर देशात पहिल्यांदा आणीबाणी लागू करण्यात आली होती.

LTTE चळवळीमुळे 28 वर्षांची आणीबाणी

श्रीलंकेत 1983 ते 2011 पर्यंत सर्वात मोठी आणीबाणी लावण्यात आली होती. श्रीलंकन ​​तमिळ आणि सिंहली यांच्यातील हिंसक आंदोलनामुळे जवळपास 28 वर्षे आणीबाणी लागू करण्यात आली होती. लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम (LTTE) हा तामिळ गट श्रीलंकेत वेगळ्या तमिळ राज्याची मागणी करत होता. गृहयुद्धाच्या काळातही आणीबाणीची स्थिती कायम होती. यानंतर 2018 मध्ये मुस्लिमविरोधी हिंसाचारामुळे आणीबाणी लागू करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cloudflare Down: जगभरात इंटरनेट ठप्प, मेकमायट्रिप, कॅनव्हासह ट्रेडिंग प्लॅटफॉर्मही पडले बंद, सायबर क्राईम की, दुसरं काही...

MPSC Prelim Exam Updates: एमपीएससीची २१ डिसेंबरची संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली जाणार की ठरल्याप्रमाणेच होणार? विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम!

Dhurandhar Review: रणवीर सिंगची करिअरमधील बेस्ट परफॉर्मन्स! धुरंधरची धमाकेदार सुरुवात! संजय दत्तचा एंट्रीला...

Babasaheb Ambedkar गेले 'तो' दिवस! 2 मिनटं वेळ काढून नक्की पाहा... अंगावर काटा येईल असा Video, कसा होता '6 December 1956'

TET Protest Kolhapur : टीईटी सक्तीविरोधातील आंदोलनात शिक्षक, पोलिसांमध्ये धक्काबुक्की, कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात प्रकार

SCROLL FOR NEXT