vijay mallya main.jpg 
ग्लोबल

विजय मल्ल्याची अवस्था बिकट, वकिलाची फी देण्यासही नाहीत पैसे

सकाळ ऑनलाईन टीम

लंडन- भारतातील सरकारी बँकांची हजारो कोटींची फसवणूक करुन लंडनमध्ये गेलेल्या विजय मल्ल्याची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. भारतात ऐषो-आरामी जीवन जगणाऱ्या आणि मौजमजा करण्यासाठी कोट्यवधींची उधळपट्टी करणाऱ्या विजय मल्ल्याला लंडनमध्ये आता पै-पैचा हिशोब ठेवावा लागत आहे. वकिलाची फी देण्यासाठीही विजय मल्ल्याकडे आता पैसे नाहीत. त्याच्या वैयक्तिक खर्चावर आता पूर्णपणे बंधने आली आहेत. 

भारताच्या तपास यंत्रणांच्या सक्तीचा सामना करत असलेल्या विजय मल्ल्याने लंडन उच्च न्यायालयाला विनंती केली आहे. फ्रान्सची मालमत्ता विकून जे पैसे मिळाले आहेत. त्यातील 14 कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. इतकेच काय तर विजय मल्ल्याची खटला हाताळत असलेल्या बॅरिस्टरने पैसे लवकर मिळाले नाहीत तर खटला लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सध्या विजय मल्ल्याची संपत्ती लंडन न्यायालयाच्या निगराणीखाली आहे. मल्ल्या ही संपत्ती विकू शकत नाही. त्याचप्रमाणे त्यांच्यावर कर्जही घेऊ शकत नाही.

दरम्यान, विजय मल्ल्याची अवस्था पाहून न्यायालयाने त्याला थोडासा दिलासा दिला आहे. खटल्याची फी भरण्यासाठी 39 लाख रुपये मुक्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिला आहे. परंतु, वैयक्तिक खर्चासाठी एक पैसाही देणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. आता याप्रकरणी शुक्रवारी सुनावणी होणार आहे. 

विजय मल्ल्याविरोधात केवळ लंडनमध्येच नव्हे तर भारतातही अनेक ठिकाणी खटले सुरु आहेत. यासाठी विजय मल्ल्याला मोठी रक्कम खर्च करावा लागत आहे. 64 वर्षीय मल्ल्याने भारतातील सरकारी बँकांची कोट्यवधींची फसवणूक करुन लंडनमध्ये फरार झाला आहे. त्याच्या पर्त्यापणासाठी भारत सरकार दीर्घकाळापासून कायदेशीर लढाई लढत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav 2025: मोफत बस गणेशभक्तांसाठी की मतांसाठी? राजकीय स्पर्धा पेटली, राजकारण्यांमध्ये चढाओढ

Mumbai News: मुंबई पोलिसांची हद्द आता कोकणापर्यंत! पोलिस ठाणे उभे राहणार, कधी आणि कुठे? वाचा...

CM Devendra Fadnavis: राज्यातील ३,५०० गावे ‘इंटेलिजंट’ करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नागपुरातील सातनवरी येथे पहिला प्रयोग

Manoj Jarange-Patil: मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय परतणार नाही: मनोज जरांगे-पाटील; प्रश्न निकाली न लागल्यास इतिहास घडवणार

Nikki Bhati Murder Case : महिलेबरोबर फिरताना पकडला गेला होता विपीन भाटी, तेव्हा....; निक्की हत्याकांड प्रकरणात मोठा खुलासा!

SCROLL FOR NEXT