WEIHT LOSS
WEIHT LOSS 
health-fitness-wellness

Natural Weight Loss Tricks: घरगुती उपायांद्वारे करु शकता वजन कमी

सकाळ ऑनलाईन टीम

पुणे: वजन कमी करण्याचा प्रयत्न बरेच जण करतात पण यामध्ये त्यांना अपयश येत असतं. वजन कमी करण्याच्या नादात आहार कमी करतात आणि त्याचा तोटा स्वतःच्या आरोग्यावर करून घेत असतात. वजन कमी करण्यासाठी एक हेल्दी रुटीन असणं गरजेचं असतं. खासकरून तुम्ही जर सकाळच्या रुटीनमध्ये योग्य तो बदल केला तर त्याचा मोठा फायदा वजन कमी करण्यासाठी होतो. सध्याच्या धावत्या जगात वजन कमी करण्यासाठी विविध ट्रीक्स वापरल्या  (Tricks For Weight Loss) पाहिजेत.

आहारात योग्य फळांचा, पालेभाज्यांचा आणि पेयांचा समावेश केला पाहिजे. वजनावर नियंत्रण करण्यासाठी खानपान असेल किंवा दिवसाचे नियोजन, या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे. बरेच लोक एकदम टोकाचा डाइट प्लॅन (Diet Plan) आणि कठोर व्यायाम करतात. पण याचा उपयोग बऱ्याचदा होत नाही. वजन कमी करण्यासाठी तुम्ही पुढील गोष्टींचा समावेश तुमच्या दैनंदिन जिवनात करू शकता.

1) सकाळचा व्यायाम-
हेल्दी आणि फीट राहण्यासाठी तसेच वजन कमी करण्यासाठी सकाळी योग्य व्यायाम करणे गरजेचं असतं.  

2) गाजर 
थंडीच्या दिवसात गाजर खाल्यास आपल्याला फायदा होतो. थंडीच्या दिवसांत जवळपास सर्व पालेभाज्या आणि फळे ही बाजारात सहज उपलब्ध असतात. थंडीच्या दिवसांत गाजरही बाजारात उपलब्ध असते. जर तुम्ही आपल्या आहारात गाजराच्या पदार्थांचा समावेश केला तर तुम्हाला ते अत्यंत फायदेशीर ठरू शकते. गाजरापासून बनवलेला ज्यूस तसेच गाजराचा हलवाही आपण खाऊ शकतो. तसेच कच्चे गाजरही आपण खाऊ शकतो.

3) मेथी :
मेथीचा दाना-दाना हा आपल्या आरोग्यासाठी फायद्याचा ठरतो. मेथी ही पचनासाठी अत्यंत उपयुक्त असते. मेथी ही थंडीच्या दिवसांत येते. मोसमानुसार येणारी ही भाजी असून थंडीच्या दिवसांत खूप फायदेशीर ठरू शकते. पचन व्यवस्थित झाल्याने विणाकरण आपले वजन वाढत नाही. याचाही फायदा मेथीची भाजी खाल्याने होतो. म्हणून आपल्या आहारात मेथीच्या भाजीचा समावेश केल्यास फायद्याचे ठरते.

4) दालचिनी :
दालचिनी ही डायबिटीज असणाऱ्यां माणसांसाठी अत्यंत उपयुक्त असते. तसेच, वजन कमी करण्यासाठी ही दालचिनी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगण्यात येते. थंडीच्या दिवसांत वजन कमी करण्यासाठी आपल्या आहारात दालचिनीचा समावेश करणे त्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. दिवसांतून तीन वेळा गरम पाण्यात दालचिनी आणि मध टाकून पिल्यास हे अत्यंत फायदेशीर ठरते. सगळ्यात पहिल्यांदा सकाळी, नाष्ट्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी असे हे पाणी तीनवेळा पिल्यास लवकर वजन कमी होण्यास मदत होते.

(Desclaimer: ही माहिती सर्वसाधारण आहे. तुम्ही याबद्दल तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.)

(edited by- pramod sarawale)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला उडणार सोने खरेदीला झुंबड, पण सोनं खरं की भेसळयुक्त असं करा चेक!

Lok Sabha Election : नाशिकमधून मोठी बातमी! शांतिगिरी महाराजांचा अर्ज बाद पण...; दिंडोरीमधूनही 5 अर्ज बाद

Adhyayan Suman : बेरोजगारी आणि आलेलं नैराश्य; हिरामंडीतील अभिनेता म्हणाला,"व्यसनाच्या आहारी जाणार होतो पण..."

SCROLL FOR NEXT