Drinking Water 
health-fitness-wellness

Anxiety Relief Tips : फक्त एक ग्लास पाणी प्या! अस्वस्थता दूर ठेवा

पाण्याची कमतरता असेल तर विविध समस्या निर्माण होतात

सकाळ डिजिटल टीम

Anxiety Relief Tips: आजकाल लोकं छोट्या छोट्या गोष्टींमुळे अस्वस्थ होतात. अनेक मुलांना तर परीक्षेआधी खूप टेन्शन येतं. ते कमी कसं करावं हे कळत नाही. तुम्ही सतत चिंता किंवा अस्वस्थ असाल तर एक करा, एक ग्लास पाणी प्या. असं केल्याने तुमची अस्वस्थता . नैसर्गिकरित्यादूर होईल. बहुतेक लोकांच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात जेव्हा ते अस्वस्थ, तणाव, चिंताग्रस्त असतात.

गेल्या काही वर्षांमध्ये 15 ते 24 वयोगटातील बहुतेक मुलं चिंतेने त्रस्त आहेत, असे आढळून आले आहे. मानवी शरीरात 60-80% पाणी असते. असे पाणी एक महत्त्वाचे पोषक तत्व आहे. तरी पाहिजे त्या प्रमाणात पाणी प्यायले जात नाही. फेडरल आरोग्य अधिकार्‍यांनी नुकत्याच एका ट्विटमध्ये म्हटले आहे की पाणी चिंता कमी करण्यास मदत करू शकते. असे असले तरी काही पुराव्यांनुसार, पाणी चिंता मोठी भूमिका बजावू शकते.

A glass of water

तज्ज्ञ सांगतात?- उन्हाळ्यात थंड पाणी प्यायल्यावर खरे समाधान मिळते. आपले शरीर अशा प्रकारे प्रोग्राम केलेले आहे की आपल्याला पाणी पिण्याची वेळ कधी येते हे कळते. काही वर्षांपूर्वी, संशोधकांच्या गटाने अभ्यास केला. त्यानुसार, हायड्रेशनचा आरोग्यावर परिणाम होतो का हे तपासले गेले. अभ्यासात आढळून आले की, पाण्याची कमतरता असेल तर थकव्याबरोबरच राग, गोंधळ, ताणतणाव वाढतात. अभ्यासात सहभागी झालेल्या लोकांना डीहाइड्रेट केले. तेव्हा त्यांच्यामध्ये तणाव,थकवा, अस्वस्थता वाढल्याचे दिसून आले. जे लोकं भरपूर पाणी पितात त्यांनी कमी पाणी प्यायल्यावर ते कमी शांत, कमी समाधानी आणि अधिक तणावग्रस्त होतात. जेव्हा संशोधकांनी अभ्यासात सहभागी झालेल्या लोकांच्या पाण्याचे प्रमाण वाढवले ​​तेव्हा ती लोकं अधिक आनंदी राहू लागली.

पाणी का गरजेचे - शरीराच्या अवयवांचे कार्य पाण्यावर अवलंबून असते. याचे कारण म्हणजे 75% मेंदूच्या ऊतींमध्ये पाणी असते. पाण्याच्या कमतरतेमुळे मेंदूतील उर्जेचे उत्पादन कमी होते. त्यामुळे मेंदूची रचना बदलू शकते. अशावेळी मेंदू योग्यरित्या कार्य करत नाही. जर पाण्याची पातळी खूप कमी असेल तर आपल्या मेंदूच्या पेशी योग्यरित्या कार्य करू शकत नाहीत.आपल्या पेशी पाण्याच्या कमतरतेच्या स्थितीला अस्तित्वाचा धोका म्हणून ओळखतात, सेरोटोनिन एक न्यूरोट्रांसमीटर (मेंदूच्या पेशींमधील एक रासायनिक संदेशवाहक) आहे जो आपला मूड स्थिर करतो आणि भावनांचे नियमन करतो. पाण्याच्या कमतरतेच्या काळात, आपल्या मेंदूमध्ये सेरोटोनिन तयार करण्यासाठी आवश्यक रसायने मिळविण्यासाठी आपण संघर्ष करतो. जरी शरीरात अर्धा लिटर पाण्याची कमतरता असेल तरीही, ते तणाव संप्रेरक कॉर्टिसॉल वाढवू शकते, जो चिंतासह अनेक मानसिक विकारांशी संबंधित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT