Heart Attack Symptoms esakal
health-fitness-wellness

Heart Attack Symptoms : हृदयविकारामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले; सर्वाधिक 2 हजार 430 रुग्णांचा मृत्यू, तापाच्या साथींचाही प्रभाव

हृदयविकाराच्या (Heart Attack) आजाराने सर्वाधिक २ हजार ४३० जणांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

हृदयविकाराने सर्वाधिक २ हजार ४३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कमी वयातही या विकाराने मृत्यू झाले आहेत.

रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या वर्षी २०२२-२३ मध्ये विविध कारणांमुळे १० हजार ८०५ रुग्णांचा मृत्यू झाला. शासकीय रुग्णालयांमध्ये साथीच्या आजारांतील हिवताप, विषमज्वर किंवा टायफाईड, गॅस्ट्रो, अतिसार, डेंगी (Dengue), स्वाईनफ्ल्यूने (Swine flu) गेल्या वर्षी एकही मृत्यू झाला नाही; परंतु हृदयविकाराच्या (Heart Attack) आजाराने सर्वाधिक २ हजार ४३० जणांचा मृत्यू झाला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शासन साहाय्यित किंवा सार्वजनिक वैद्यकीय सुविधांतर्गत ५ दवाखाने, ६५ प्रसूतीगृह, ६७ प्राथमिक आरोग्यकेंद्रे आणि ३७८ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र (Ratnagiri Health Centre) आहेत. या रुग्णालयांमध्ये वेगवेगळ्या आजारांमुळे मृत्यू झाले असले तरी जिल्हा आरोग्य विभागाकडील माहितीनुसार, साथीच्या आजारांतील हिवताप, विषमज्वर किंवा टायफाईड, डेंगी, स्वाईनफ्ल्यूने एकही मृत्यू झालेला नाही.

शासकीय रुग्णालयांमध्ये वेळेत उपचार केले गेल्याने या आजाराने मृत्यू झालेला नाही. साथीच्या आजारातील क्षयरोगाने ९३ तर श्वसनक्रियेसंबंधित आजाराने ३२४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बिगरसाथीच्या आजारामध्ये हृदयविकार येतो. या हृदयविकाराने सर्वाधिक २ हजार ४३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कमी वयातही या विकाराने मृत्यू झाले आहेत.

कर्करोगाने २९४ तर एड्सने २५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. बाळंतपणात ६ मातांचा मृत्यू झाला आहे. पक्षघाताने ५६७, मूत्रपिंडाच्या आजाराने १ हजार २७८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अपघाताच्या प्रकारातील मृत्यूचे प्रमाणही मोठे आहे. यामध्ये ११५ आत्महत्या असून, रहदारी वाहतुकीने १९५ जणांचा मृत्यू झाला आहे. इतर अपघातांमध्ये १८ मृत्यू झाले आहेत. इतर अनेक कारणांनी मृत्यू होतात. हे मृतदेह शासकीय रुग्णालयांमध्ये आणले जातात. अशा मृत्यूंचे प्रमाणही मोठे आहे. ५ हजार ४६० मृत्यू अशा इतर कारणांमुळे झाल्याची नोंद आहे.

स्पर्धात्मक युग, वाढते ताणतणाव त्यामुळे ब्लडप्रेशर, हृदयविकार आदी विकार कमी वयोगटातील व्यक्तींमध्येही आढळतात. व्यस्त जीवनशैलीमुळे व्यायाम, योगासने आदींचा अवलंब होत नाही. लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे हृदयविकारातून मृत्यू होतात. हे टाळण्यासाठी दिनचर्या व ऋतूचर्या सुरळीत ठेवणे आवश्यक आहे. आहारविहाराचे सुंदर वर्णन आयुर्वेदात सांगितले आहे. आयुर्वेद हा एक पर्याय ठरू शकतो.

-डॉ. प्रतीक झिमण, रत्नागिरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT