आरोग्य

Health Tips : जेवताना पाणी प्यावे की नको? ऐका तज्ज्ञांचा सल्ला

सकाळ डिजिटल टीम

डॉक्टर जेवणाच्या मध्ये पाणी न पिण्याचा सल्ला देतात. जेवणाच्या मध्ये पाणी पिणे पचन क्षमतेसाठी धोकादायक असते, असा समज आजवर आपला होता. पण, एका आहारतज्ज्ञांच्या मते, या समजुतीत कोणतेही तथ्य नसून पाणी न पिणे यामुळे तुमची पाणी पिण्याची सवय बंद होऊ शकते.

जर जेवताना किंवा जेवणानंतर पाणी प्यायला आपण टाळाटाळ केली तर पुढील ३ तास आपण विना पाण्याचे राहू. जेवण करताना पाणी पिऊ नये असे कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत, असे आहारतज्ज्ञ भुवन रस्तोगी यांनी म्हटले आहे. रस्तोगी त्यांनी इंस्टाग्राम पोस्टमध्ये याबाबत स्पष्ट केले आहे.

आहारतज्ज्ञांच्या मते, अनेक लोकांचा असा विश्वास आहे की, जेवणासोबत किंवा नंतर पाणी प्यायल्याने पचन एंझाइम कमकुवत होतात आणि त्याचा परिणाम पचनावर परिणाम होतो. याचे समर्थन करण्यासाठी सध्या कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. त्यामुळे त्यात काही तथ्य नाही.

पुढे रस्तोगी म्हणतात की, “जेवल्यानंतर पाणी न पिणे खरोखर हाणीकारक ठरू शकते. कारण यामुळे आपले पाणी पिण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.

जे लोक जेवताना पाणी पित नाहीत. ते दररोज 3 किंवा 4 लिटर पाणी पिऊ शकत नाहीत. त्यांना डिहायड्रेशनचे गंभीर परिणाम दिसून येतात. अशा लोकांना बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी स्टोन, यूटीआय इत्यादी सारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात, असेही रस्तोगी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Teacher Recruitment: महाराष्ट्रात शिक्षकांची भरती कधी होणार? निवृत्ती वयाबाबत मोठं वक्तव्य करत शिक्षण मंत्र्यांनी तारीखच सांगितली!

IND vs ZIM, T20 WC: हार्दिक पांड्याचे सलाम-ए-इश्क! दोन षटकार.. शेवटच्या चेंडूवर फिफ्टी.. माहिका शर्माला फ्लाइंग Kisssss Video Viral

IND vs ZIM, T20 WC: अभिषेक शर्माला सूर गवसला, भारताने उभारली वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावसंख्या; २००७ चा विक्रम मोडला

Khamgaon Crime : सख्ख्या भावाचा खून करून मृतदेह जाळला व राख फेकली नदीत; राहुड येथील घटना, दोन्ही आरोपीस अटक

Pune Property Tax: पुण्यात ५०० चौरस फुटांच्या आतील घरांना करमाफी मिळणार का? विरोधकांची तयारी मात्र भाजपनेच...

SCROLL FOR NEXT