Benefits of Getting Married Before the Age of 30 esakal
फोटोग्राफी

तिशीच्या आत लग्न कराल तर फायद्यात राहाल, वाचा ५ फायदे

तिशीनंतर लग्न झालं तर अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं

सकाळ डिजिटल टीम

सध्या मुला-मुलींना त्यांचं करिअर, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र्य असणं जास्त महत्वाचं वाटतं. त्यामुळे अनेकजण तिशीनंतर लग्न करण्याचा विचार करतात. पण, तिशीनंतर लग्न झालं तर अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं

लग्नासाठी जी परिपक्वता लागते ती वयाच्या २१ वर्षांनंतर तुमच्यात अधिक येते. त्यामुळे सरकारने लग्नाचे वय (Marriage Age) २१ वर्षे निश्चित केले आहे. पण, . नात्यात प्रत्येकाला १०० टक्के योग्य जोडीदार (Partner) मिळतोच असं नाही. काहींना काही गुण-दोष दोघांच्यात असतात. पण हे गुण-दोष अधिक चांगल्या प्रकारे समजून पुढे जायचे असेल तर काही निर्णय योग्य वयात घ्यावे लागता. तुम्ही जर तिशीच्या आत लग्न केलेत तर त्याचे पाच चांगले फायदे आहेत.(Benefits of Getting Married Before the Age of 30)

एकमेकांना समजून घेण्यासाठी योग्य वेळ- कमी वयात लग्न केल्याने मुलींना नवरा आणि सासरच्या लोकांना समजून घेण्यासाठी जास्त वेळ मिळतो. सासू- सासरे सुनेला मुलीप्रमाणे समजून घेतात. तसंच, कोणतीही नवीन गोष्ट शिकण्यासाठी तुमच्याकडे भरपूर वेळ असतो. कधी कधी सासू सुनेला स्वयंपाक करायला शिकवते. म्हणजेच तुम्हाला नव्या गोष्टी शिकता येऊ शकतात. नवा अनुभव तुम्ही सहजपणे आत्मसात करू शकता. (Ideal Age to Get Married)
रोमान्स टिकेल दिर्घकाळ - तिशीच्या आत लग्न केल्याने वैयक्तिक आयुष्याबरोबरच रोमान्सही दिर्घकाळ टिकेल. अशी जोडपी दिर्घकाळ तरूण राहतात. तसेच ती एकमेकांसोबत खूप रोमँटिक असतात.
मुले होण्यासाठी कमी दबाव- तुमचे कमी वयात लग्न झाल्याने घरातलेही लवकर मुलं होऊ देण्यासाठी जबरदस्ती करत नाहीत. वय जास्त असेल तर वर्षाच्या आत मुलं होत नाही म्हणून अनेकजण टोमणे मारतात. त्यामुळे त्रास होतो तो वेगळाच. उलट, कमी वयात लग्न करणाऱ्या जोडप्यांना नेहमीच मुलांना आरामात जन्म देण्याचा आणि त्यांच्या आयुष्याचा आनंद घेण्याचा सल्ला दिला जातो.
जबाबदारीची जाणीव- कमी वयात लग्न केल्याने मुला-मुलींना त्यांच्या जबाबदारीची जाणीव होते. मुलींची मानसिकता आणि परिपक्वता पातळी 21 ते 25 वर्षे वयाच्या मुलांपेक्षा खूप जास्त असते. त्यामुळे मुलींना गोष्टी चांगल्या प्रकारे समजू शकतात.
आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी वेळ -उशीरा लग्न केले की मुलींना काहीवेळा करिअरमधून ब्रेक घ्यावा लागतो. पण तुम्ही योग्य वयात लग्न केले तर तुम्हाला पुरेसा वेळ मिळतो. आधीच तुम्ही तुमचे काम आणि करिअर पुढे नेऊ शकता.. तसेच पती-पत्नी मिळून कोणताही व्यवसाय किंवा कोणतेही काम सुरू करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Goa-Solapur flight: वादळी वाऱ्याचा धोका; गोवा-सोलापूर विमान रद्द, प्रवाशांना पुढील तिकीट उपलब्ध करून देण्यात येणार

मोंथा चक्रीवादळाने अरबी समुद्र खवळला, उरणमध्ये ३ बोटी भरकटल्या; 50 मच्छिमारांशी संपर्क तुटला

Latest Marathi News Live Update : नाशिक-चांदवड पुलाचा भराव गेला वाहून, ग्रामस्थांना करावा लागतोय जीवघेणा प्रवास

PAK vs SA : फुसका बार..! Babar Azam दोन चेंडूंत झाला गार; पुनरागमनाची फक्त हवा, पाकिस्तानी चाहत्यांना आलं रडू Video

Yami Gautam and Emraan Hashmi: यामी गौतम आणि इमरान हाश्मी पहिल्यांदाच एकत्र, ‘हक’मधून समाजाविरुद्ध लढणाऱ्या आईची कथा

SCROLL FOR NEXT