Road potholes between Raver - Vivara. esakal
जळगाव

Jalgaon News : अंकलेश्र्वर- बऱ्हाणपूर महामार्ग बनलाय मृत्युचा साफळा; 66 कोटींतून थातूरमातूर डागडुजी

अंकलेश्र्वर - बऱ्हाणपूर या राष्ट्रीय महामार्गाची रावेर- सावदा दरम्यान रावेर- सावदा दरम्यान ठिकठिकाणी दुरवस्था झाली आहे. याबाबत वाहनधारक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : अंकलेश्र्वर - बऱ्हाणपूर या राष्ट्रीय महामार्गाची रावेर- सावदा दरम्यान रावेर- सावदा दरम्यान ठिकठिकाणी दुरवस्था झाली आहे. याबाबत वाहनधारक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.

काही ठिकाणी दुरुस्ती झाली आहे, पण ती इतकी थातूरमातूर आहे की, या कामी ६६ कोटी रुपये खर्च झाले असतील यावर वाहनधारक विश्वास ठेवायला तयार नाहीत. (bad road condition on Ankleshwar Burhanpur highway jalgaon news)

तळोदा - बऱ्हाणपूर हा नियोजित राष्ट्रीय महामार्ग वेगवेगळ्या पद्धतीने चर्चेत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ताब्यात घेतल्यापासून त्याची देखभाल दुरुस्ती रखडली होती. रस्त्याची काही ठिकाणी खूपच दुरवस्था झाली होती. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या दुरुस्तीसाठी ६६ कोटी रुपयांची तरतूद केली. मात्र ती थातूरमातूर झाली आहे.

खासदारांच्या पत्राला टोपली

सावदा - रावेर ते मध्यप्रदेशची सरहद्द चोरवडपर्यंत अनेक ठिकाणी खूपच दुरवस्था झाली आहे. विवरा - रावेर दरम्यान खूपच खड्डे आहेत. पावसाळ्यानंतर ते ठेकेदाराने काही ठिकाणी भरले, मात्र बहुतेक खड्डे ‘जैसे थे’ आहेत. जिथे खड्डे भरले आहे तिथे डांबराचा वापर पुरेसा न झाल्याने ते पुन्हा उखडले आहेत.

या रस्त्यावरून वाहन चालविणे अवघड झाले आहे. एक खड्डा चुकविण्याचा प्रयत्न केला की दुसरा समोर आलाच म्हणून समजा. हा सध्याचा राज्य मार्ग व नियोजित राष्ट्रीय महामार्ग आहे का असा प्रश्न पडावा अशी या रस्त्याची स्थिती झाली आहे.

ठेकेदाराने केलेल्या या थातूरमातूर दुरुस्तीकडे 'न्हाई'च्या अधिकाऱ्यांनी लक्षच दिले नसल्याचे वाहन धारकांचे म्हणणे आहे. या दुरुस्तीबाबत खासदार रक्षा खडसे यांनी एकदा पत्र लिहिले पण अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदाराने त्या पत्राला केराची टोपलीच दाखविलेली दिसते.

दुरुस्ती खर्च पाण्यात

जळगाव येथे नुकत्याच झालेल्या ‘न्हाई’च्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ही श्रीमती खडसे यांनी हा दुरुस्तीचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र त्यावर ही अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदाराने दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे. या दुरुस्तीसाठी खर्च केलेले ६६ कोटी रुपये पाण्यात गेल्याची वाहनधारकांची भावना आहे. न्हाईच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या दुरुस्तीची पाहणी करून पुन्हा नीटनेटकी दुरुस्ती करून घ्यावी, अशी वाहनधारकांची मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT