Abhijit Raut esakal
जळगाव

जळगाव : बोगस बियाण्यांबाबत सतर्क रहा - जिल्हाधिकारी राऊत

बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करा अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांनी दिल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात बोगस बियाणे येता कामा नये आणि आलेच तर शेतकऱ्यांची मोठी फसवणूक होईल. बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांचा शोध घ्या. सतर्क राहून बोगस बियाण्याची विक्री होवू देवू नका. विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करा अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्या आहेत.


आज जिल्हास्तरीय कृषि निविष्ठा सनियंत्रण समितीची सभा झाली. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी या सुचना दिल्या.
जिल्हाधिकारी राऊत यांनी कंपनी प्रतिनिधींना बियाण्यांचा पुरवठा वेळेत करण्यास सांगून शेतकऱ्यांनी मिश्रखत घरी तयार करण्याचा सल्ला दिला. यावेळी बियाणे खते किटक नाशके खरेदी करताना घ्यायची काळजी व जीवाणू खते वापर व फायदे याबाबत बॅनरचे अनावरण जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

शेतकऱ्यांसाठी जिल्ह्यातील उपलब्ध खत साठा सहज समजावा यासाठी तालुकानिहाय ब्लॉगस्पॉट उपलब्ध करून दिला आहे. त्याचे अनावरण करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस जिल्हा परिषेदेच कृषि विकास अधिकारी वैभव शिंदे, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, मोहिम अधिकारी विजय पवार, खते बियाणे किटकनाशके विक्रेते कंपनी जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Local Train: दिवसभरात १,४१४ लोकल फेऱ्या अन्...; गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचा दिलासादायक निर्णय

अजितदादांच्या निधनानंतर त्याच दिवशी मंत्रालयातून ७५ शाळांना अल्पसंख्यांक दर्जा; एकाच संस्थेच्या २८ शाळा

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

SCROLL FOR NEXT