Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : 1 लाखासाठी विवाहितेचा छळप्रकरणी चाळीसगावात गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव : येथील छत्रपती संभाजीनगरातील विवाहितेचा कर्ज फेडण्यासाठी माहेरून एक लाख रुपये आणावे, या मागणीसाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

येथील छत्रपती संभाजीनगरात राहणाऱ्या २५ वर्षीय विवाहितेचा २०१७ मध्ये धुळे येथील शिरूड गावातील भूषण देविदास चौधरी यांच्याशी विवाह झाला. सुरवातीला पतीसह सासरच्या मंडळींकडून चांगली वागणूक मिळाली.(Case has been registered in Chalisgaon in case of harassment of a married woman for 1 lakh Jalgaon Crime News)

त्यानंतर कर्ज फेडण्यासाठी माहेरून एक लाख रुपये आणावे, यासाठी तगाडा लावून शारीरिक व मानसिक छळ करायला सुरुवात केली. आई-वडिलांची परिस्थिती हलाखीची असल्याने विवाहितेने नकार दिला.

त्यावर सासरच्या मंडळींकडून चापटबुक्यांनी मारहाण करून मुलांसह विवाहितेला घराबाहेर हाकलून देण्यात आले. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात पती भूषण देविदास चौधरी, सासू कमलबाई देविदास चौधरी, सासरे देविदास लक्ष्मण चौधरी, दीर ईश्वर देविदास चौधरी, नणंद सुनीता दत्तात्रय चौधरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Video : ''भारतात तुम्ही मला सुरक्षा देऊ शकत नाही का?'', राहुल गांधींची पोलिसांबरोबर बाचाबाची, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Mumbai Health Report: राज्यात पावसाळी आजारांचा कहर; मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद

ब्रिटिशांच्या १८८१ व करवीर संस्थानच्या १९०२ च्या गॅझेटिरमध्ये मराठा व कुणबी एकच, तरीही मराठा समाजाला झगडावं लागतय; कोल्हापुरात आंदोलन पेटणार

Indira Ekadashi 2025: पूर्वजांना मुक्त करण्यासाठी महिलांनी काय करू नये, जाणून घ्या नियम

Latest Marathi News Updates : परतीच्या पावसामुळे पाणीपातळीत वाढ, मुंबईतील धरणांत ९८.८२ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT